नंदुरबार l प्रतिनिधी
पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी शासनाचा योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी नेहमी सज्ज राहायला हवं.पक्षात आता काम केल्याशिवाय पर्याय नसणार आहे.आपल्या वार्डात नगरसेविकांनी महिला सक्षमीकरणाचे काम करीत एका नगरसेविकेने किमान 25 महिलांची टीम बनवून त्यांना सोबत घेत संघटन मजबूत करावे अशा सूचना शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक सरिता कोल्हे- माळी यांनी केल्या.
शिवसेना भवन,आमदार कार्यालयात पक्षाचा महिला आघाडीची बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी समन्वयक सरिता कोल्हे बोलत होत्या. बैठकीचा अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी उपस्थित होते. प्रस्तावना महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत यांनी केली. आयोजित बैठकीत महिला संघटन वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी म्हणाल्या, पक्षात पुरुष मंडळी ज्याप्रमाणे काम करत असतात त्याचप्रमाणे महिलांनी देखील काम केले पाहिजे. विविध विकासात्मक कामांच्या माध्यमातून नारी शक्तीचे कार्य जनमानसापर्यंत पोचवावे. यावेळी सभापती शितल वसावे, नगरसेविका सोनिया राजपूत, नगरसेविका मनीषा गिरासे, रेखा चौधरी, मनीषा वळवी, सायली रघुवंशी,सकीनाबी कुरेशी, ज्योती पाटील,युवती सेना जिल्हाप्रमुख राजश्री मराठे, महिला शहर प्रमुख वैशाली माळी, काजल मच्छले आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते









