नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील वावद येथे शेती वाटणीच्या कारणावरुन दोन कुटूंबात मारहाण झाल्याने पाच जणांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीवरुन आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील वावद येथील बन्सीलाल लोटन जाधव यांची आई नगूबाई जाध्व यांने नावे असलेली शेती नावावर करुन देण्याच्या कारणावरुन बन्सीलाल जाधव व त्यांच्या मुलगा निलेश यास राजेश लक्ष्मण जाधव, राकेश लक्ष्मण जाधव, लक्ष्कमण लोटन जाधव, प्रमिला लक्ष्मण यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच निलेश यास राकेश जाधव याने काचेची बाटली फोडून उजव्या हाताच्या पंजाला बोटावजवळ मारुन दुखापत केली व मनगटावर तोंडाने चावा घेतला. तसेच शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत बन्सीलाल जाधव यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.
तर लक्ष्ण लोटन जाधव यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडीलोपािीर्जत शेती वाटणीच्या कारणावरुन लक्ष्मण जाधव यांना सुदाम लोटन जाधयव, बन्सीलाल लोटन जाधव, निलेश बन्सीलाल जाधव, पवन रविंद्र पानपाटील यांनी काठीने मारहाण केली. तसेच राजेंद्र जाधव व राकेश जाधव यांनाही काठीन मारहाण करुन दुखापत केली. याबाबत लक्ष्मण जाधव यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. आनंद मोरे करीत आहेत.