Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळवे हे गाव बनू पहातंय केळीचा नवा हब

Mahesh Patil by Mahesh Patil
November 7, 2022
in कृषी
0
तळवे हे गाव बनू पहातंय केळीचा नवा हब
बोरद l प्रतिनिधी
  तळोदा येथून बोरद रस्त्याला अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर असलेले तळवे हे गाव जळगावच्या धर्तीवर केळीसाठी नवा हब ठरू पाहत आहे.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की,तळोदा तालुका हा सर्वत्र बागायत तालुका म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहे.अशा या तळोदा तालुक्यात तळवे या गावी अनेक मोठमोठाले शेतकरी आपली शेतजमीन कसत आहेत. त्याचबरोबर अनेक प्रकारचे प्रयोग राबवून आपल्या शेतीमधून उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यासाठी येथील शेतकरी प्रसिद्ध आहेत.
 याचेच वैशिष्ट्य म्हणजे तळवे ह्या गावाचा संपूर्ण  भौगोलिक विस्तार पहिला तर हे गावं ३६५.५९ हेक्टर एवढ्या क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. तर शेतीयोग्य जवळजवळ ३५०० हेक्टर शेतजमीन या परिसरात येते. या ३५०० हेक्टर अंतर्गत मोठमोठाल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असल्याने ते आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण पिक घेण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.अनेक प्रकारच्या केळीच्या जाती  आपल्या शेतात लागवडीसाठी आणल्या जातात त्यामध्ये टिशू रोपांना अधिक महत्व दिले जाते.अर्थात केळीबाबत नाविन्यपूर्ण प्रयोग या ठिकाणी राबविताना शेतकरी दिसून येतात.नवती तसेच कांदेबाग या दोन टप्प्यात उत्पादन घेतले जाते.
   केळी उत्पादनाबाबत देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने जळगांव जिल्हा हा केळीउत्पादनात प्रथम क्रमांकावर येतो.त्याच धर्तीवर तळोदा तालुक्याचा जर विचार केला तर तळवे हे गावं तालुक्यातील सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे गाव म्हणून आजच्या घडीला पाहिल्याक्रमांकवर आहे.साधारणतः ५०० ते ७०० हेक्टर जमिनीत हे उत्पादन घेतले जाते. त्याखालोखाल बोरद गावाचा क्रमांक येतो. परंतू व्यापारी दृष्ट्या तळवे परिसरातील केळीला निर्यातीच्या दृष्टीने अधिक महत्व आहे. म्हणून तळवे हे गावं केळीचा हब बनू पाहत आहे.
     येथील शेतकरी केळीबाबत विविध ठिकाणी भेटी देऊन उत्पादन वाढीबाबत माहिती घेत असतात व निर्यातक्षम उत्पादन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात व त्यात ते यशस्वी ही होतात.
     उत्तर भारतातील व्यापारी केळी खरेदी करण्यासाठी या गावाला आवर्जून भेट देतात.व गुणवत्तापूर्ण केळीला निर्यातीच्या दृष्टीने योग्य भाव देऊन खरेदीही करतात.गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे उत्पादन चांगले असूनही भाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.मात्र आता परिस्थिती सुधारली आहे.शेतकरी जोमाने केळीचे उत्पादन घेत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी येथे पालकमंत्री पदी ना. डॉ. विजयकुमार गावित यांची नियुक्ती झाल्या बद्दल भव्य सत्कार

Next Post

दोघा बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे बालिकेचा मृत्यू, न्यायालयाने ठोठावली चार दिवसांची पोलीस कोठडी

Next Post
नंदूरबार जि. प.त सत्तांतराची शक्यता, भाजपा कडून उपाध्यक्ष पदासाठी काँग्रसचा उमेदवार अर्ज दाखल

दोघा बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे बालिकेचा मृत्यू, न्यायालयाने ठोठावली चार दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

October 15, 2025
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

October 15, 2025
जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

October 15, 2025
राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

October 13, 2025
जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

October 13, 2025
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

October 13, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group