नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील डोगेगाव येथे जिल्हा परिषद नंदुरबार जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे भुमीपूजन जि.प चे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांचा हस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आले.
यावेळी आरोग्य व शिक्षण समिती सभापती अजित नाईक,भरडु गटाचे जि प सदस्य मधुकर नाईक,डोगेगाव सरपंच हर्षाली वळवी,ग्रा म सदस्य अजित वळवी,प्रकाश वळवी,फत्तेसिंग पाडवी,यशवंत गावीत,सयाजी गावीत,विकास वळवी,मानसिंग वळवी,दिलीप पवार,दिपक वसावे आदी उपस्थित होते.नळपाणी पुरवठा योजना ४३ लाख ६३ हजार ८४१ रुपये खर्चीक आहे.यावेळी जि.प उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी म्हणाले की, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचा मार्गदर्शनाखाली ५० वर्षात विकास केली आहे यापुढे ही करत राहणार आहे माजी मंत्री नाईक यांनी जिल्हात भरपुर नेते घडविले ते सुध्दा त्यांचा मार्गदर्शनाने विकास कामे करीत आहे. विरोधकांना फुकटाचे श्रेय घेण्याची सवय पडली आहे आज ते तुमचा गावात येतील नारळ फोडतील फुकटात प्रसिध्दी मिळवतील त्यांना लोकांचा प्रश्नाशी काहीच घेणे देणे नसते.अर्धा पैसा हा केंद्रसरकार देत असते बाकी पैसा हा राज्यसकार देत असते या सर्व योजना राबविण्याचे काम जिल्हा परिषद करीत असते नळपाणी पुरवठा योजनांची संपुर्ण देखभालीची सर्व जबाबदारी जिल्हा परिषद ची असते.असे सांगितले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार डोगेगाव ग्रा.प सदस्य यांनी केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप पवार यांनी केले यावेळी कार्यक्रमात डोगेगाव गावाचे ग्रामस्थ मोठया संख्यने उपस्थित होते.