नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीतर्फे नंदुरबार जिल्हयातील शेतकऱ्यांना शेती पुरक पाणी पंपासाठी दिवसा अखंडीत 12 तास विज पुरवठा मिळावा यासाठी स्वभिमानी शेतकरी संघटनेतर्फे समशेरपुर फाट्याजवळ आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकन्यांच्या विविध प्रश्नासाठी माजी खा. राजु शेंट्टी मागील आठ दिवसापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना 12 तास दिवसा विज अखंडीत मिळावी व विज वसुली ज्या प्रध्दतीने शेतकऱ्यांकडून वसुली केली जाते म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक बाबर शाहीमध्ये जी हुकूमशाही केली जात होती . त्याच्यप्रमाणे शेतकन्याचा अपमान करून व आर्थिक नुकसान करून थांबावावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.मागील आठ दिवसापासुन माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्याचा जिव्हाळ्याच्या असलेल्या मागण्या होऊन ठिय्या आंदोलन करीत आहेत . त्या आंदोलनाला राज्य सरकार व महावितरण कंपनी यांनी गंभीरतेने न घेतल्याने स्वभिमानी शेतकरी संघटनेतर्फे समशेरपुर फाट्याजवळ आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना शेती पुरक पाणी पंपासाठी दिवसा अखंडीत 12 तास विज पुरवठा न केल्यास आमच्या शेतातून जाणाऱ्या शहरी भागात वितरण केली जाते त्यात व्यत्यय निर्माण करून आंदोलन तीव्र करावे लागेल . असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष नथू पाटील तालुकाध्यक्ष ईश्वर चौधरी आदी उपस्थित होते.