Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पपई तोड करणाऱ्या मजुरांच्या मजूरीत ५० रुपयांची वाढ केल्याने पाच दिवसापासून सुरू असलेला संपाचा तिढा सुटला

team by team
December 30, 2021
in कृषी
0
पपई तोड करणाऱ्या मजुरांच्या मजूरीत ५० रुपयांची वाढ केल्याने  पाच दिवसापासून सुरू असलेला संपाचा तिढा सुटला

तळोदा l प्रतिनिधी
गेल्या चार,पाच दिवसांपासून पपई तोड करणाऱ्या मजुरांच्या मजूरी वाढविण्याबाबत व्यापाऱ्यांनी सकारात्मकता दाखवून त्यांचा मागणी नुसार ५० रुपये मजूरी वाढविल्यान संपाच्या तिढा सुटूल्यामुळे मजुरांनी देखील संप मागे घेतला आहे. त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि मजुरांच्या या वाढीव मजुरीच्या भार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर लादू नये.अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पपईची तोड करणाऱ्या मजुरांना पपईचे व्यापारी प्रती टन साडे तीनशे रुपये मजूरी देत असतात. परंतू वाढत्या महागाईमुळे ही मजूरी परवडत नसल्याने मजुरांनी गेल्या चार ,पाच दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले होते.या मजुरांची टणास व्यापाऱ्यांनी पन्नास रुपयांची वाढ करावी अशी त्यांची मागणी होती.मात्र मजुरांच्या या संपामुळे शेतकऱ्यांची पपई तोड देखील थांबली होती.साहजिकच शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत होते.कारण झाडावरच पपई पिकून खाली पडत होती.शिवाय वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भाव देखील होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा अडचणीत मोठी वाढ झाली होती.साहजिकच मजुरांच्या या वाढीव मजूरी बाबत व्यापाऱ्यांनी तोडगा काढावा अशी शेतकऱ्यांची देखील अपेक्षा होती.मजुरांच्या संपाची दखल घेवून मंगळवारी शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीत व्यापारी ब मजुरांचे प्रतिनिधी उपस्थित होते.वाढीव मजूरी बाबत चर्चा होवून मागणी नुसार टणास पन्नास रुपये वाढीव दर वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे मजुरांनी देखील आपले कामबंद आंदोलन मागे घेवून पपई तोडणीस जाण्याचा निर्णय घेतला.व्यापारी व मजूर यांच्या सकारात्मक निर्णयाचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.तथापि या वाढीव मजुरीच्या भार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर लादू नये अशीही अपेक्षा शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे.कारण पपई तोडीची मजूरी हे व्यापारी आपल्या खिशातून न देता शेतकऱ्यांकडून वसूल करीत असतात.सद्या ३५० मजूरी शेतकरी कडून घेतली जात आहे.त्यामुळे हा वाढीव भुर्दंड व्यापर्यानीच सोसावा असेही शेतकरी सांगतात.
सातत्याने घसरतोय आहे पपईच्या दर
सातत्याने पपईच्या दर घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे.पपईच्या उत्पादनावर केलेला आर्थिक खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी अक्षरशः हवालदील झाला आहे.कारण रासायनिक खते,पपईची रोपे व लागवडीच्या अवाढव्य खर्च पाहता तेवधाही निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. सध्या तर पावणे तीनशे रुपये पपईच्या भाव झाला आहे. स्थानिक काही व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणाच्या फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप आहे.व्यापाऱ्यांनी मजुरांप्रमानेच पपईच्या पुरेशा दराबाबत सकारात्मक विचार करावा.अशी शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अथक प्रयत्नांनी मुलीला मिळाले जीवदान, पाच लाखात एखाद्याला होतो गॅस गॅंग्रीन आजार

Next Post

ऑनलाइन परीक्षांना पर्यायी व्यवस्था म्हणून ऑफलाईन परीक्षेची सुविधा द्या: जितेंद्र ढोले.

Next Post
ऑनलाइन परीक्षांना पर्यायी व्यवस्था म्हणून ऑफलाईन परीक्षेची सुविधा द्या: जितेंद्र ढोले.

ऑनलाइन परीक्षांना पर्यायी व्यवस्था म्हणून ऑफलाईन परीक्षेची सुविधा द्या: जितेंद्र ढोले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add