नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त आनंदाच्या शिधाचे वितरण करण्याच्या निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. हा ‘आनंदाचा शिधा’ ज्या पिशव्यांवर देण्यात येतो यापूर्वीही त्यावर भगवान गणराय, प्रभू श्रीराम, छ. शिवाजी महाराज यांचे छायाचित्रे छापली होती. सदर पिशवी ही टिकाऊ नसून टाकाऊ असल्याने त्या पिशव्या नको त्याठिकाणी पडलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या आहेत. त्यामुळे देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या अवमान होतो. तरी शासनाने गणेशोत्सव निमित्ताने ‘आनंदाचा शिधा’ पिशव्यांवर श्री गणरायांचे आणि यापुढे हिंदु देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची छायाचित्रे छापू नये या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना जिल्हा पुरवठा अधिकारी मिसाळ साहेब यांचे मार्फत देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने ‘आनंदाचा शिधा’ या नावाने महाराष्ट्रतील जनतेला अल्पदरात जीवनावश्यक वस्तु उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या हा निर्णय स्तुत्य जरी असला तरी आनंदाच्या शिधा ज्या पिशवींमध्ये वितरित केला जातो त्यावर हिंदू देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची छायाचित्रे छापलेली असतात. पिशव्यांची गुणवत्ता बघता त्या पिशव्या टिकाऊ नाहीत तर टाकाऊ असतात.
थोड्या दिवसांनी त्या फाटतील आणि रस्त्यावर किंवा नको त्या ठिकाणी पडलेले अवस्थेत मिळू शकतात त्यामुळे हिंदु देवी देवता आणि राष्ट्र पुरुष यांच्या छायाचित्राचे अवमान होऊ शकतो.म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि प्रशासनाने देवी देवताआणि राष्ट्रपुरुष यांचे छायाचित्र नसलेल्या पिशव्या आनंदाच्या शिधासाठी वापर करावा असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, मोठा मारुती मंदिराचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी,
श्री संत दगाजी महाराज मंदिर चौपाळेचे मोहन पटेल, विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष रतिलाल पटेल, गणपती मंदिराचे मुख्य पुजारी प्रदीप भट, भागवताचार्य रवींद्र पाठक, बाबा गणपती मंडळाचे सुनील सोनार, पियुष सोनार, मयूर सोनार श्री दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष अमोल सोनार, मारुती व्यायाम शाळेचे अर्जुन मराठे, घारू कोळी, संत नरहरी व्यायाम शाळेचे ओम सोनार, ओम जितेंद्र सोनार, श्री गणेश मंडळाचे अरूण सोनार, हिंदुत्ववादी घनश्याम मराठे, हिंदू सेवा सहाय्य समितीचे जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, सुयोग सूर्यवंशी, जयेश भोई, विजय जोशी आदी उपस्थित होते.