नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील ग्रामपंचायतीचा ६९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून आदर्श गाव पाटोदा जि.छत्रपती संभाजी नगरचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील होते.
कार्यक्रमास गटविकास अधिकारी जयवंत उगले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सेवानिवृत्त आयुक्त यशवंत पवार, जि.प सदस्य देवमन पवार, डॉ सयाजीराव मोरे, पं.स.सदस्य कमलेश महाले, संतोष साबळे,ठाणेपाडाचे सरपंच विशाल पवार,ग्रामविकास अधिकारी आर.एन.बैसाणे, परिसरातील गावांतील सरपंच,उपसरपंच,सदस्य उपस्थित होते.
सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग ५ टक्के निधीतुन दिव्यांगाना खुर्च्या वाटप करण्यात आल्या.शालेय विद्यार्थी, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावातील अधिकारी,कर्मचारी,व समाजसेवक यांचा स्मृतीचिन्ह देउन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी भास्करराव पाटील यांनी आपल्या जिवनात आलेले सामाजिक राजकीय प्रंसग व गावाचा विकास लोकसहभागातून आपल्या ग्रामपंचायत मार्फत कसा शक्य आहे ते उदाहरणासह स्पष्ट केले. गाव हगणदारी मुक्त,गांवातील स्वछता,झाडे लावणे, ग्रामपंचायतची कर वसुली, व गावाचा विकासासाठी सरपंच, ग्रामसेवक,यांना विकास कामात गावकऱ्यांनी मदत करावी असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित सरपंचांचा भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक यशवंत पवार यांनी तर आभार देवमन पवार यांनी मानले. यावेळी महिला, युवक, युवती, विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.