तळोदा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांचे वीज बिल भरण्यासाठी सवलत देऊन त्यांचा वीज पूरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत नागेश पाडवी यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंपांचे वीज बिल थकीत असल्याने थकीत वीज बिला अभावी वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून सक्तीचे वीज बिल भरण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची विजे अभावी गैर सोय होत आहे म्हणुन वीज बिलाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत देण्यात यावी व वीज पुरवठा सुरु करण्यात यावा अशी मागणी निवेदनात भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे.








