बोरद l प्रतिनिधी
बोरद येथे आज दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.थंड वारा त्याचबरोबर आकाश झाकोळलेले होते.काही वेळातच वातावरणात अचानक बदल झाल्यानंतर दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी पाऊसास सुरुवात झाली अचानक सोसाट्याचा वारा सुटला व पावसाच्या सरी कोसळू लागल्या या मुळे बोरद येथील बाजारपेठेत स्मारक चौक तसेच रस्त्यालगत आपला व्यवसाय धरून बसलेल्या व्यवसायिकांमध्ये एकच धांदल उडाली.हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच याबाबत अंदाज वर्तविला होता.
अचानक आलेल्या या पावसामुळे छोट्या व्यावसायिकंबरोबर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे मिरची पीक धोक्यात आलं आहे त्याचबरोबर गहू आणि हरबरा या पिकाला याचा फटका बसणार आहे वरील दोन्ही पिकांच्या उत्पन्नात घट होण्याची समस्या या अवकाळी पावसामुळे निर्माण झाली आहे.