नंदूरबार l प्रतिनिधी
भालेर येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवणाऱ्या चार जणांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 डिसेंबर रोजी महावितरणचे कर्मचारी प्रवीणपुरी गोसावी, निलेश सोनवणे, दशरथ पाडवी, अशोक बागुल,राजेंद्र भिल, अनिल बोरसे हे भालेर येथे गेले होते. त्यावेळी युवराज रघुनाथ पाटील, भिका विश्राम पाटील, दिनेश विक्रम पाटील, राहुल दगा पाटील यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बसवून बाहेरून कुलूप लावून कोंडून ठेवले. याबाबत गोसावी यांच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








