नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयातील सर्व न्यायालयातील तडजोडक्षम प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात दावे प्रकरणे,चलनक्षम धनादेश प्रकरणे, कौटुबिक वाद प्रकरणे व दाखलपुर्व प्रकरणांमध्ये,वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व बँका,श्रीराम फायन्सास,बी.एस.एन.एल यांचे थकीत बिले,ई-ट्रॅफिक चलन, यांची ३७९६ प्रकरणे रविवार दि.३० एप्रिल रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली.यांत ४ कोटी ४४ लाख ३१ हजार ०६६ रुपये वसुल करण्यात आले.
लोकन्यायालयाच्या प्रसंगी नंदुरबार मुख्यालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश आर.एस.तिवारी, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ आर.जी.मलशेटटी, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायधिश .व्ही.जी.चव्हाण, वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायधिश.एस.टी.मलिये,वरिष्ठ स्तर २रे सह दिवाणी न्यायधिश आर.एन. गायकवाड,कनिष्ठ स्तर व प्रथम श्रेणी सह दिवाणी न्यायधिश वाय.के.राउत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायधिश डि.व्ही हरणे, उपस्थित होते.मदतीसाठी विधिज्ञ अॅड.के.एच.सावळे, अॅड.अविनाश राजपूत,अॅड.अझहर पठाण,अॅड.एम.डी.मोरे, ॲड.भारती आमले यांनी सदस्य म्हणुन काम पाहिले.तसेच सदर लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयातील प्रबंधक एच.व्ही.जोशी, वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. पी.बी. चौधरी,
जिल्हा विधी प्राधिकरणचे अधीक्षक जे.वाय.सानफ,न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ यांनी मोलाचे सहकार्य केले.सदरच्या लोकन्यायालयात प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात येवून ४ कोटी ४४ लाख ३१हजार ०६६ रुपये वसुल करण्यात आले. दिवाणी ,मोटार अपघात प्रकरणे, चलनक्षम धनादेश प्रकरणे ,कौटूंबिक वाद प्रकरणे, फौजदारी प्रकरणे,भुसंपादन प्रकरणे,व इतर किरकोळ फौजदारीचे २९५ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात २ कोटी ५३ लाख २८ हजार ७३८ रूपये तर बॅक वसुली प्रकरणे, वीज थकबाकी वसुली प्रकरणे,पाणीपटटी,घरपटटी थकबाकी वसुली,बी.एस.एन.एल.ची ३५०१ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात १ कोटी ९१ लाख ०२ हजार ३२८ रुपये वसुल करण्यात आले.