नंदुरबार l प्रतिनिधी
मतदारांनी विश्वास ठेवून सर्व जागांवर उमेदवार विजयी केले आहेत. त्यामुळे आता जास्त जबाबदारी वाढलेली आहे. शेतकरी,कष्टकऱ्यांची सेवा करण्याची पुनश्च संधी मिळालेली आहे. विरोधकांनी पैसा व संपत्तीच्या जीवावर पदाधिकाऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला.ज्यांना सत्तेच्या माज व सूज चढली होती ती आता निकालीच्या माध्यमातून उतरलेली उतरलेली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संवाद साधला.ते म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट यार्ड्यात शेड बनवण्यात येईल. भाजीपाला लिलाव प्रक्रिया सकाळी पाच व दुपारी तीन वाजता सुरू होईल. स्वतंत्र कांदा लिलावाची व्यवस्था करण्यातील असं त्यांनी सांगितले.