नंदूरबार l प्रतिनिधी
उदगीर,जि.लातूर येथे 22,23 व 24 एप्रिल दरम्यान होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विखरण येथील आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनसेवा करणारे युवा कवी व लेखक रामकृष्ण पांडुरंग पाटील यांना त्यांची कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे
नुकतंच काही वर्षापासून आपल्या लेखणीचा माध्यमातून ते समाज प्रबोधन करतात. त्यांच्या कथा, कविता, चारोळ्या, लेख आदी महाराष्ट्रातील नामवंत दैनिक, मासिक आणि दिवाळी अंकातून साहित्य प्रकाशित होत असते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर कविता सादर करण्यासाठी आमंत्रण मिळाल्याबद्दल रामकृष्ण पाटील यांचे अनेकांनी कौतुक व अभिनंदन केले.