नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज सकाळपासूनच ऊन सावलीचा खेळ सुरू असताना दुपारनंतर 4.50 वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील बामखेडा, जयनगर, तोरखेडा, हिंगणी परिसरात गारपीट सह अवकाळी पावसाने दहा ते पंधरा मिनिटे जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली.
यंदा बदलत्या हवामानामुळे अवकाळी पाऊस थंडीतील वाढ, गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेत झालेली वाढ, अशा विविध हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना निसर्गाची दाहकता सुरूच आहे. आज झालेल्या अवकाळी पावसात वाढ झाल्यास काढणीला आलेल्या गहू, हरभरा, आजवान या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.