नंदुरबार । प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने यंदाचा उन्हाळी हंगाम मार्च ते मे महिन्यात तापमान कसे राहील, याचे दीर्घकालीन पूर्वानुमान जाहीर केले.
उत्तर महाराष्ट्र , कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. तसेच देशात मार्च महिन्यात पावसाचे प्रमाण पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असून राज्याचा दक्षिण भाग वगळता इतर भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला. देशाच्या एकूण हवामानाचा विचार करता यंदा उष्ण लहरी सारखी परिस्थिती देखील काही काळ असेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली.
यंदा तापमानाचा अंदाज जास्त वर्तवल्याने शेतकरी बंधूनी उन्हाळी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार योग्य अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून पिकांना उष्ण लहारीपासून उष्माचा ताण बसणार नाही.
जमिनीचे तापमान नियंत्रित राहील, तसेच कमी पाणी लागणार्या पिकांची आणि कमी कालावधीत येणार्या वाणांची निवड करावी, आंतरमशागतीची कामे वेळेवर करावीत, तण व्यवस्थापन करावे, पिकात प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा जेणेकरून मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्तवेळ टिकून राहील अशी माहिती कृषि हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली.