म्हसावद l प्रतिनिधी
शहादा-खेतीया मार्गावरील सुसरी धरण वळण रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने नेहमी वाहन उलटून अपघात होत आहे. यात शेतकऱ्यांचे शेत मालाचे मोठया प्रमाणात नुकसान होत असून जीवितहानी होण्याची शक्यता आहे याबाबत चे निवेदन भाजपा किसान मोर्चा प्रदेश सदस्य डॉ.किशोर पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदाराना दिले होते. याची दखल घेत तहसीलदार यांनी संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने भाजपा किसान मोर्चा तसेच शेतकऱ्यांमार्फत रस्ता रोको आंदोलन ३ मार्च रोजी सकाळी दहा वाजेला करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा किसान मोर्चा प्रदेश सदस्य डॉ.किशोर पाटील यांनी दिली.
शहादा-खेतीया या मार्गावरील सुसरी धरण वळण रस्त्यावर गेल्या चार वर्षापासून काम सुरू आहे त्यात काही पूर्ण देखील झाला आहे त्यात वळण रस्त्यावर एक ते दीड किलोमीटर अंतराचे काम अपूर्णावस्थेत असल्याने दैनंदिन अपघात घडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेत मालाचे नुकसान होऊन रोज उसाची ट्राली, कापूस आदी पिकांचे नुकसान होत आहे तरी संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून तरी या अपघातात जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? अधिकारी का ठेकेदार की प्रतिनिधी तरी आपल्या स्तरावरून तात्काळ संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन काम त्वरित सुरू करावे जर काम त्वरित सुरू झाले नाही तर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येइल याला जबाबदार प्रशासन राहील असे निवेदन तहसीलदार डॉ.मिलींद कुलकर्णी यांना देण्यात आले होते. याची दखल तहसीलदार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या परंतु आजपर्यंत संबंधित विभागाने रस्ता दुरुस्ती न केल्याने अपघात रोज घडत असून याकडे दुर्लक्ष झाल्याने भाजप किसान प्रदेश सदस्य डॉ.किशोर पाटील तसेच शेतकऱ्यांमार्फत सुसरी धरण वळण रस्ता दुरुस्ती साठी ३ मार्च सकाळी१० वाजेला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.








