अक्कलकुवा l प्रतिनिधी
प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रम अंतर्गत अल्पसंख्याक समुदयाची आर्थिक सामाजिक व शेक्षणिक स्थितीत सुधरणा होऊन विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे विविध विभागाना निगर्मित करून अल्पसंख्यांक विकास समिति गठित करन्यात यावी असे आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या मार्गदर्शनाने अक्कलकुवा अल्पसंख्याक तालुका उप.प्रमुख नासिर बलोच यांनी दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे का, 15 कलमी कार्यक्रम हा अल्पसंख्यांकाच्या विकासाच्या महत्वाच्या कार्यक्रम आहे.अल्पसंख्यांक समुदायाचे शेक्षणिक सक्ष्मीकरण, रोजगारभिमुख कौशल्य विकास आणि पायभूत सुविधा निर्माण करण्याच्या उदेशाने विविध योजनाच्या अंमलबजावणी बहुआयनी धोरने स्वीकारले आहे.अल्पसंख्याक समाजाची आर्थिक सामाजिक व शेक्षणिक उन्नतीसाठी असलेल्या योजना प्रधान्याने व प्रभावीपने राबविन्याचे आदेश केंद्र शासनाने निगर्मित केलेले आहे. तसेच विविध योजनांचा लाभ व दर्जेदार पायभूत सुविधा मिळवण्यासाठी योजना व कार्यक्रमाची प्रभाविपणे अंमलबजावणी होत आहे किवा कैसे त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीचे गठन करुण शासन स्थावर बैठक घेणे बंधन कारक आहे. तरी प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रम अंतर्गत अल्पसंख्याक समुदयात विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरिल योजना व कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश संबधित सर्व विभागाना निर्गमित करावे व अल्पसंख्यांक समिति गठित करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदन देताना शिवसेना अक्कलकुवा अल्पसंख्याक तालुका उप.प्रमुख नासिर बलोच, जमील शेख उपस्थित होते.