Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहाद्यात संस्थास्तरावर खामगाव येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयाला तर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान

Mahesh Patil by Mahesh Patil
October 10, 2021
in सामाजिक
0
शहाद्यात संस्थास्तरावर खामगाव येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयाला  तर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान

शहादा | प्रतिनिधी

संपूर्ण देशात संकरीत व रासायनिक बी बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यामूळे प्रत्येक जण विषारी अन्न प्राशन करीत असल्याने आयुष्यमान कमी झाले. सुदृढ आणि निरोगी आरोग्य ठेवण्याकरीता प्रत्येक शेतकर्‍याने देशी वाणाचा वापर करावा असे आवाहन पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपरे यांनी केले.येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ येथे आयोजित पुरुषोत्तम पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी आ.राजेश पाडवी, कृऊबाचे चेअरमन सुनिल पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित होते. यंदा पुरुषोत्तम पुरस्कारासाठी संस्थास्तरावर खामगाव जि.बुलढाणाच्या टिळक राष्ट्रीय विद्यालयाची तर व्यक्तिगत पातळीवर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे रा.कोंभाळणे ता.अकोले जि.नगर यांची निवड करण्यात आली आहे.
पुढे बोलतांना बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपरे  म्हणाल्या, काळ्या मातीशी नाते जोडल्याने मी इथपर्यंत पोहचली आहे.समाजासाठी काहीतरी करायचे होते.आयुष्यात खुप कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागले. पण मी डगमगली नाही.वडीलांच्या संस्काराने हायब्रीड खाण्याला प्रतिबंध घालत गावठी बी बियाणे तयार करण्यावर भर दिला. माझ्या परिवारापासूनच हायब्रीड खाणे बंद केले. बचत गटापासून मी माझ्या गावठी वाणाच्या उपक्रमास सुरुवात केली. जूनं ते सोनं हे ठेवलेच पाहिजे. जूनं खाणं जर ठेवले तर आरोग्य चांगले राहिल. गावरान खाणारे आजही न थकता कामे करता.आत्ताच्या भाज्यांना चव नाही. आरोग्याला जपायचे असेल तर गावराण खाण्यावर भर दिला पाहिजे. आपण काळया आईला संपविण्याच्या मागे लागलो आहेत. विषारी औषधे टाकून जमिनीची पोत खराब होत आहे.जमिन खराब झाली तर आपण कोणाकडे पाहणार आहोत. त्यासाठी रासायनिक तणनाशके मारु नका. पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी मला आता काम करायचे आहे. प्रत्येक गावात देशी वाण तयार करणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांनी वेगवेगळी पिके घेण्यावर भर दिला पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक गावात देशी वाण लावण्यावर भर दिला आहे. प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या घरासमोर एक देशी गाय बांधली पाहिजे. ती आपल्यासाठी लक्ष्मी आहे. मला आजपर्यंत जे पण पुरस्कार मिळाले आहेत ते माझे नाही तर काळ्या आईचे आहेत. विषारी अन्नामूळे आयुष्यमान कमी झाले आहे. यासाठी रान भाज्यांचे संवर्धन केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी आ.राजेश पाडवी म्हणाले, समाजाप्रती योगदान देणारे व्यक्तीमत्व म्हणून स्व.पी.के.अण्णा पाटील यांच्याकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्व.अण्णासाहेब पाटील यांनी शेतकर्‍यांचा हितासाठी चळवळीत भाग घेवून या परिसरात सहकाराची बीजे रोवली. त्यामुळे या परिसराचा विकास झाला आहे. थांबला तो संपला हे त्यांचे ब्रीद नेहमी उपयोगात येणारे असून याच दृष्टिकोनातून मी कार्य करीत आहे. स्व.अण्णासाहेबांचे कार्य कायम प्रेरणादायी ठरणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खासदार डॉ.हिना गावित यांच्या आश्वासनानंतर पिंगाणे येथील उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले

Next Post

नंदुरबार येथे लोखंडी सळई चोरणाऱ्या चौघांना अटक

Next Post

नंदुरबार येथे लोखंडी सळई चोरणाऱ्या चौघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group