नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरण प्रकल्पात पाणी पातळी खालवल्याने नंदुरबार शहराला पाणीपुरवठ्याचा प्रश्न दरवर्षी निर्माण होत असतो.
याचाच दूरदृष्टीकोनातून विचार करत नंदुरबार शहराला योग्य प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा या संकल्पनेतून माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीपात्रातून पाईपलाईन द्वारे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी योजना राबविण्यात यावी व त्यासाठी भरघोस निधी महाराष्ट्र राज्य शासनाने नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यासाठी द्यावा अशी मागणी केली आहे. याच मागणीचे निवेदन माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित,नगरपालिकेचे विरोधी पक्षनेता हिरालाल चौधरी, भाजपा नगरसेवक आनंदा माळी, नगरसेवक लक्ष्मण माळी, नगरसेवक पंकज चौधरी, माजी नगरसेवक संतोष वसईकर, सामाजिक कार्यकर्ता सतीश मराठे, माजी नगरसेवक प्रकाश भोई आदी उपस्थित होते.








