Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेनेच्या मागणीमुळे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचयातींचे विभाजन : शिवेसना नेते मा.आ.चंद्रकांत रघुवंशी

team by team
May 11, 2022
in राजकीय
0
शिवसेनेच्या मागणीमुळे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचयातींचे विभाजन : शिवेसना नेते मा.आ.चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील दऱ्या खोऱ्यात वसलेल्या आदिवासी बांधवाचा विकास साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील मोठ्या आणि दुरवच्या ग्रामपंचयातींचे विभाजन करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली होती. अक्राणी येथे विधानसभा प्रचारावेळी आले असतांनाच शिवसैनिकांनी जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचे विभागाज का आवश्यक असल्याची माहीती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनासा आणुन दिली होती असे शिवेसना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, याच अनुशंगाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन जिल्ह्यात नव्याने अनेक ग्रामपंचायतींची निर्मीती झाली आहे. या ग्रामपंचायत विभाजणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न केल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या वतीने या नेत्यांचे विशेष आभार देखील मानत आहोत.
नंदुरबार मध्य विभाजनानंतर मांडवी बु या मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन करुन याठिकाणी नव्याने 8 ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. यात 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर तोरणमाळ ग्रामपंचायतीचे विभाजन करुन या ठिकाणी देखील नव्याने आठ ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत. तोरणमाळ मधल्या या आठ ग्रामपंचायतीमध्ये 10 गाव समाविष्ट असणार आहेत. तर तिकडे भुषा ग्रामपंचायतीचे विभाजन करुन याठिकाणी नव्याने तीन ग्रामपंचायतींची निर्मीती करण्यात आली आहे. या तीन ग्रामपंचायतींमध्ये 9 गावांचा समावेश असणार आहे. तर धडगाव मधल्या चिचकाठी ग्रामपंचायतीचे विभाजन करुन चिचकाठी आणि चांदसैली अशा दोन ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत. तर राजबर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन करुन नव्याने 7 ग्रामपंचायतींची निर्मीती करण्यात आली आहे. यात सात ग्रामपंचायतीमध्ये 10 गावांचा समावेश असणार आहे. अशा पद्धतीने आता धडगाव नव्याने 27 ग्रामपंचायतींची निर्मीती झाली आहे. तर नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे ग्रामपंचायतीचे देखील विभाजन होवुन आता घुली आणि राकसवाडे अशा दोन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत.
या सर्व ग्रामपंचायत विभाजनासाठी शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी 3 ते 4 महिने सातत्याने पाठपुरावा केला , यासर्व ग्राम पंचायती विभाजन प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, कृषी सभापती गणेश पराडके, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पराडके यांनी मुख्यमंत्री सह साऱ्या मंत्र्यांचे आभार मानले आहे .नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतीचे मुख्यालय गावातच अथवा नजीकच्या गावात असल्याने अनेक दाखले, महत्वांच्या कामांसाठी दऱया खोऱयातल्या आदिवासी मानसांना मदत होणार असुन अतिदुर्गम भागाचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी ग्रामपंचयात विभाजनाचा हा महत्वपुर्ण निर्णय मैलाचा दगड ठरेल असा विश्वास शिवेसना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गौसेवा आणि वृक्ष लागवड विश्वातील सर्वात मोठी सेवा : ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी

Next Post

वर्षा जाधव यांची गाईडचा जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी निवड

Next Post
वर्षा जाधव यांची गाईडचा जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी निवड

वर्षा जाधव यांची गाईडचा जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add