Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना झाली सुरुवात, 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट

team by team
March 15, 2022
in शैक्षणिक
0
जिल्ह्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना झाली सुरुवात, 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट

नंदूरबार l प्रतिनिधी
गेली दोन वर्ष दहावी बोर्ड परीक्षांसाठी कोरोणा संसर्गजन्य रोग अडथळा ठरला होता, परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावी बोर्डाच्या परीक्षा जाहीर झाल्या आहे. आज पासून दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी एम. व्ही. कदम यांनी दिली आहे.
यंदाच्या बोर्ड परीक्षेचे विशेष म्हणजे 70 ते 100 गुण असलेल्या पेपरला अर्धा तास जास्त वेळ मिळणार आहे तसेच 40 ते 60 मार्कच्या पेपरला पंधरा मिनिटं अधिकचे मिळणार आहे.
आजपासून सुरू झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यात एकूण 376 शाळा उपकेंद्र म्हणून निर्मिती करण्यात आली. २०२१-२२ वर्षासाठी 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी बोर्डातर्फे आढावा घेऊन परीक्षेसाठी आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहे, तसेच जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जात आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेतच देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षांना मुकावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील तणाव दूर करण्यासाठी स्वतःच्या शाळेतच कोणताही दबाव व झडती न घेता परीक्षां देण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती नंदुरबार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी १६ मार्च पर्यंत जीपीएस बसविणे बंधनकारक: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

शबरी तथा रमाई घरकुल योजनेचे उद्दिष्ट वाढविण्याबाबत आरपीआय आठवले पक्षाच्या वतीने जि. प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन

Next Post
शबरी तथा रमाई घरकुल योजनेचे उद्दिष्ट वाढविण्याबाबत आरपीआय आठवले पक्षाच्या वतीने जि. प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन

शबरी तथा रमाई घरकुल योजनेचे उद्दिष्ट वाढविण्याबाबत आरपीआय आठवले पक्षाच्या वतीने जि. प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add