Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी शिबिराचे आयोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
July 28, 2021
in कृषी
0
शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी शिबिराचे आयोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार ! प्रतिनिधी
जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांना  खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे आणि अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबार्डचे प्रमोद पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक अशोक चाळक आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या, पीक कर्ज देण्यातील अडचणी दूर करण्यात याव्यात. शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि इतर कृषि कामासाठी वेळेवर कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करावी. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यासाठी विशेष मोहिम घेण्यात यावी.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची माहिती अधिकाधिक नागरिकांना देण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान जनधन खात्याद्वारे मिळविण्याच्या प्रक्रीयेत येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यात बँक सखीच्या नेमणूकीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पीक कर्ज वाटपासह विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला. जिल्ह्याला खरीप हंगामासाठी 563 कोटी 56 लक्ष तर रब्बी हंगामासाठी 140 कोटी 92 लक्ष रुपयांचे उद्दीष्ट असून आतापर्यंत 264 कोटी 87 लक्ष रुपये अर्थात एकूण वार्षिक उद्दीष्टाच्या 38 टक्के पीक कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवनदायी योजना आणि मुद्रा कर्ज योजनेबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या पत आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

तंबाखू मुक्ती अभियानासाठी जळगाव जिल्हा ब्रॅण्ड एमबेसिडर म्हणून राज मोहम्मद खान शिकलगर यांची नियुक्ती

Next Post

रनाळा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

रनाळा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add