Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस, केळी बागेचेसह रब्बी पिकांचे नुकसान, नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

team by team
March 8, 2022
in कृषी
0
शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस, केळी बागेचेसह रब्बी पिकांचे नुकसान, नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी
हवामान खात्याने तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील , निंभोरा,कोंढावळ, खापरखेडा, बोराळे, काकरदा येथे वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस झाला. त्यामुळे या गावांमधील काढणीवर आलेले केळी बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


साधारणता काल दि.7 मार्च रोजी 4:30 वाजेच्या सुमारास जयनगरसह परिसरातील गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह गारपीटचा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे केळी बागेसह, पपई, गहू, हरभराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गारपिटीच्या पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे परिपक्व झालेले घडसहित केळीची झाडे मोठ्या प्रमाणावर पडली आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. पण हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असून शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे.
अवकाळी पावसामुळे इतर रब्बी पिकेही वाया गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे, त्यांचे गहू आडवे पडले आहे. खरीप पिकांची कसर रब्बी पिकांमध्ये निघेल या आशेवर शेतकरी होता. मात्र अवकाळी पावसाच्या आगमनामुळे केळीसह गहू, हरभरा,पपई, कांदा, मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. म्हणून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यायला हवी. अशी मागणी जयनगरसह परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे जायंट्स ग्रुपतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबीर

Next Post

पपई खरेदी करून ४७ लाख रुपये न देता पसार झालेल्या व्यापाऱ्याला दिल्ली येथून पोलीस व शेतकऱ्यांनी पकडले, न्यायालयाने दिली सात दिवसांची पोलीस कोठडी

Next Post
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

पपई खरेदी करून ४७ लाख रुपये न देता पसार झालेल्या व्यापाऱ्याला दिल्ली येथून पोलीस व शेतकऱ्यांनी पकडले, न्यायालयाने दिली सात दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add