नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील नंदपुर गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी नदीतून धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय.
नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा असून या जिल्ह्यात दळणवळणाच्या संदर्भात अनेक समस्या आहेत नंदुरबार तालुक्यातील नंदपुर गावात अंत्यसंस्कार नदीच्या त्या काठावर केले जात असतात मात्र पूल नसल्याने अंत्यसंस्कार आणि शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
मरणानंतरही मरणयात्रा संपत नसल्याचं अंत्यसंस्कारासाठी करावी लागणारी कसरत पाहून म्हटलं तर वाईट ठरू नये. ही व्हायरल दृश्य सातपुड्याच्या दुर्गम भागातील नाहीत नंदुरबारच्या जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर असलेल्या नंदुरबार तालुक्यातील नंदपुर गावातील आहेत गावाजवळ जाणाऱ्या नदीच्या दुसऱ्या बाजूला गावातील नागरिकांच्या शेती आणि स्मशानभूमी आहे पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं नदी दोरीच्या साह्याने किंवा होळीच्या साह्याने पार करावी लागत असते गावात एखाद्या ची मयत झाली तर गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. गावातील एका अंत्यविधीसाठी करावी लागणारी कसरत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.