Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे :नंदूरबार जिल्हयातील पारा पोहचला ४३.४ अंशापर्यंत

Mahesh Patil by Mahesh Patil
May 9, 2023
in राज्य
0
अरे बापरे : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता

नंदुरबार l प्रतिनिधी

 

वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ झाली असून कमाल तापमान येत्या काही दिवसात ४२ ते ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी हवामान केंद्रातर्फे देण्यात आली.दरम्यान आज ४३.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

 

नंदूरबार जिल्हयात आज ४३.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी सांगितले की, भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. तापमानात अचानक वाढ झाल्याचे दिसून येत असून पुढील काही दिवस तापमान जास्त राहील.

 

 

कमाल तापमानात वाढ होऊन पारा ४२ ते ४५ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात वाढ होत असल्याने शेतकरी बंधूंनी उन्हाळी भुईमूग,बाजरी, मूग, तीळ इत्यादी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. पाणी देण्यासाठी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडावी. जेणेकरून पिकांना उष्म्याचा ताण बसणार नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहील.

 

फळ झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा ज्यामुळे मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्तवेळ टिकून राहील. फळधारणा अवस्थेत असलेल्या आंबा, केळी व पपईसारख्या फळांचे उन्हापासून बचाव करण्यासाठी पिशवीने फळे झाकून घ्यावीत. वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता जनावरांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.

 

जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे किंवा पोते पाण्याने भिजवून शरीरावर बांधावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, लोकांनी पुढील काही दिवस विशेषतः दुपारी १२ ते ४ या काळात थेट उन्हात जाणे टाळावे, शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवून मुबलक प्रमाणात कालांतराने पाणी प्यावे, अशी माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हे तर गजबच : पोलिसांना हिसका देऊन शहादा न्यायालयातून सिने स्टाईलने संशयित फोर व्हीलर मधून फरार

Next Post

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विजेची सोय करा,शिंदे शिवसेनेची मागणी

याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विजेची सोय करा,शिंदे शिवसेनेची मागणी

December 18, 2025
खाकीसाठी जिद्दीची धाव; युवा उमेदवारांसाठी भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे ऐतिहासिक सराव चाचणी; ६०० हून अधिक तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग

खाकीसाठी जिद्दीची धाव; युवा उमेदवारांसाठी भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे ऐतिहासिक सराव चाचणी; ६०० हून अधिक तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग

December 18, 2025
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वैष्णवी मानकरला सुवर्णपदक

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वैष्णवी मानकरला सुवर्णपदक

December 18, 2025
समुद्रावर नंदनगरीचा ठसा! दहा किमी सागरी जलतरणात देव राजपूत राज्यात आठवा

समुद्रावर नंदनगरीचा ठसा! दहा किमी सागरी जलतरणात देव राजपूत राज्यात आठवा

December 18, 2025
नंदुरबारसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यांत सेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, उल्लेखनीय कामगिरीचा नाशिक येथे गौरव

नंदुरबारसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यांत सेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, उल्लेखनीय कामगिरीचा नाशिक येथे गौरव

December 18, 2025
नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

December 18, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group