नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का.वी.प्र. संस्था संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती समता दिन म्हणून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक न्याय, समता, बहुजन कल्याण तसेच वंचित व मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या समतावादी विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी व समाजाने आत्मसात करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रमास प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ए. एस. पाटील यांनी केले.
यावेळी उपस्थितांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करत त्यांच्या समतेच्या, शिक्षणाच्या व सामाजिक न्यायाच्या विचारांना उजाळा दिला. “समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीतच खऱ्या विकासाचा मार्ग आहे,” हा शाहू महाराजांचा विचार आजही समाजाला समता, प्रगती आणि लोककल्याणाचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ असल्याचे उपस्थितांनी अधोरेखित केले.








