Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या ठरत आहेत वरदान : आ.राजेश पाडवी

team by team
September 16, 2021
in कृषी
0
कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी  रानभाज्या ठरत आहेत वरदान : आ.राजेश पाडवी
तळोदा l प्रतिनिधी
रानभाज्या या निसर्गाची देण आहे. अनेक रानभाज्यांना आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असून त्या पौष्टिक व जीवनसत्वयुक्त असल्याने कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या रानभाज्या वरदान ठरणार आहेत. असे प्रतिपादन शहादा-तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांनी तळोदा येथे झालेल्या रानभाज्या महोत्सवात केले.
              तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात आजीवन अध्ययन विस्तार विभाग आणि रेवा बहुद्देशीय सामाजिक संस्था रेवानगर ता.तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६० पेक्षा अधिक विविध रानभाज्यांचे स्टॉल आदिवासी महिलांनी लावले होते. या कार्यक्रमाला मॅगसेसे पुरस्कार विजेते तथा सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, प्रमुख अतिथी आ.राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, सिनेट सदस्य मनीष जोशी, नगरसेवक योगेश पाडवी, किसान संघाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र राजपूत, दिनेश खरात, दिनेश नाईक, कृषी विज्ञान केंद्राचे दहातोंडे,यशवत पाडवी, आदी उपस्थित होते. आ.पाडवी पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने आठवड्यात किमान दोन वेळा या रानभाज्यांचा आहारात समावेश करावा.तसेच पवार  यांच्या बारीपाडा या गावचे कौतुक केले. तस काम तळोदा तालुक्यातही सुरू करण्यात येईल असं या प्रसंगी त्यांनी सांगितले. उदघाटनपर चैत्राम आपल्या भाषणात म्हणाले की, आपल्या अवती भोवती भरपूर नैसर्गिक संसाधन आहेत. स्थानिक साधन संपत्तीचा उपयोग करून विकास साधता येईल. आम्ही गाव संघटित केलं. जर गाव संघटित झालं तर खूप काही होऊ शकत. आम्ही ४८५ बांध बांधून गावातून वाहून जाणारे पाणी अडवलं. सामुदायिक वनसंवर्धनाचा प्रयोग ४५ गावांना सुरू केला. जर गाव संघटित झालं तर वन संवर्धन होईल असे ते म्हणाले. डॉ  टाटिया यांनी म्हटले की, आजच्या फास्ट फूड च्या जमान्यात जे खायला नको ते आपण खातो व आजारी  पडतो जे खायला हवं ते रानभाज्या , पालेभाज्या इ. खात नाही त्यामुळे डायबिटीस, हार्टअटॅक व इतर आजारांना आपणच निमंत्रण देतो.या रानभाज्यांचे जर आपण सेवन केले तर आपण आजारी पडणार नाही.असे ते म्हणाले यावेळी जिल्हा परिषद सदस्य संगीता वळवी, निशा पावरा, अँड.संजय पुराणिक, स्वीय सहाय्यक विरसिंग पाडवी, न्यू-हायस्कुल चे प्राचार्य अजित टवाळे, सुधीरकुमार माळी, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पेश पाडवी यांनी केले तर सूत्रसंचालन पं.स.सदस्य दाज्या पावरा यांनी केले.
या महोत्सवात १५ वनधन विकास गटाच्या माध्यमातून ६० च्या वर  वनभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यात बांबू कोम, तेंदू पत्ता, मतर हिंग्या, गिलके, भोपळा पाने, देशी परवड, बांबू कोम, शिरी पाला, खाटी भेंडी, कडवी भेंडी, खाटगोला भाजी, केहवानी, रसगुल्लो, माटला पालो, केहवानी, बेहरा, अंबाडी पाने व फुले  यांच्यासह इतर ६० पेक्षा अधिक प्रकारच्या रानभाज्या महिलांनी मांडल्या होत्या.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील तुवरदाळ आणि मिरचीने नंदुरबारचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले : राजेंद्र दहातोंडे

Next Post

शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्तीवर स्वच्छाग्रहींची कार्यशाळा उत्साहात

Next Post
शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्तीवर स्वच्छाग्रहींची कार्यशाळा उत्साहात

शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्तीवर स्वच्छाग्रहींची कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add