नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी शेतकर्यांची परवानगी न घेता शेतजमिनीच्या बेकायदेशीर वापर करणारा सूजलॉन कंपनीविरोधात कारवाई करावी ,सुजलोन कंपनीच्या मालकांवर अनुसूचित जाती जमाती कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पंधरा वर्षे जमिनीचा बेकायदेशीर वापर केल्याबद्दल दोन लाख प्रमाणे १५ वर्षाचे ३० लाख रु नुकसान भरपाई मिळावी यासाठी पवन ऊर्जा जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समिच्या वतीने आज पासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पवन ऊर्जा निर्माण करणारी कंपनी सुजलॉन व तिची उपकंपनी सर्जन रियालिटी ज्यांनी आदिवासी मागासवर्गीय शेतकर्यांच्या शेकडो एकर जमिनीवर टावर रस्ते व वीज वाहक उभे करून शेतकर्यांच्या ज्ञानाच्या व गरिबीचा फायदा घेतला आहे याबाबतीत समितीच्या व तालुक्यातील शेतकाम मार्फत मुख्यमंत्री राज्यपाल यांच्याकडील शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी असंख्य निवेदने देण्यात आली त्यातील काही निवेदनाच्या संबंधात जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी होता परंतु गेल्या तीन महिन्यापासून या निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. जिल्हाधिकार्यांनी तहसीलदार व मंडळाधिकारी यांना चौकशी साठी नेमून एका विशिष्ट कालमर्यादेत उत्तर देण्यास सांगितले होते. तरी देखील निवेदनाची दखल घेतली नसल्याचे लक्षात येत आहे .या गंभीर विषयाकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे शासनाने सुजलोन कंपनी व त्यांच्या अधिकार्यांना बोलावून शेतकरी व समिती यांच्यासमोर कंपनीची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असताना त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही म्हणून आज पासून पवन ऊर्जा शेतकरी संघर्ष कामगार संघर्ष समितीतर्फे आज पासून आमरण उपोषण करण्यात येत आहे . या उपोषणाला पवन ऊर्जा जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे, अशोक पाटील, अंकुश पाटील ,भीमराव सामुद्रे अरूणाबाई भिल ,उषाबाई भिल ,विठ्ठल भिल कृष्णा भिल, बापू दगा भिल व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.








