नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील अग्रवाल भवन येथे नवापूर तालुका भाजपातर्फे वन-जमीन अतिक्रमधारकांना न्याय, वन पट्टे धारकांना सुविधा यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत,जेष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटीया,भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,जिल्हा सचिव संदिप अग्रवाल,भाजपचे विसरवाडी शहर उपाध्यक्ष तनुज अग्रवाल,आदी उपस्थित होते.या प्रसंगी वन जमीन अतिक्रमण धारकांना न्याय व वन पट्टे धारकांना सुविधा मिळावी त्यांचे सर्व कागदपत्र तपासुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी डॉ कांतीलाल टाटीया म्हणाले की आपल्या आदिवासी बांधवांना वन जमीन अतिक्रमण धारकांना न्याय वन पट्टे धारकांना सुविधा मिळावी यासाठी आम्ही १९८० पासुन लढा देत आहोत.यासाठी आमच्यावर गुन्हे पण दाखल झाले होते मात्र आमचा संघर्ष अजुन पर्यत सुरु आहे.त्यावेळी २९ हजार लोकाचे अतिक्रमण वनविभागाने काढले होते.नवापूर तालुक्यात आता पर्यत १ हजार ८०० लोकांना वन पट्टे मिळाले आहेत.भरत गावीत यांचे चांगले नेतृत्व मिळाले याचे तुम्ही सोने करा.तसेच वनपट्टे मध्ये सातबारा खातेउतारा महसुली खाते दप्तरी नोंद करुन त्यांचे तलाठी मार्फत रुपांतरीत करुन घ्यावे या नंतर भरत गावीत म्हणाले की शासनाचा व्यक्ती लाभाच्या योजना लाभ घेण्यासाठी वनपट्टे अतिक्रम धारकांना जे प्रमाणपत्र जिल्हास्तरीय समिती यांनी दिले आहे.अशा वनपट्टे धारकांना सातबारा खातेउताराची नोंद महसुल खात्याव्दारे करुन देण्याचे आश्वासन दिले.तसेच वनपट्टे धारकांना पिक कर्ज बँक उपब्लध करुन देत नसते त्यामुळे वनपट्टे धारकांना शेती करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात.तसेच वनपट्टे धारक शेतकर्यांचा विहीरी,बोरवेल,इत्यादी शेतीपंपाना तातडीने विज कनेक्शन देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करु.तसेच जे वनदावे जिल्हास्तरीय समितीने फेटाळुन लावले आहेत असे वनदावे आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांचा कडेस अपिल दाखल करुन अपात्र वनदावे पात्र करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करु असे सांगितले या कार्यक्रमाची प्रस्तावना एजाज शेख यांनी केले.तर सुत्रसंचलन विसरवाडी शहर उपाध्यक्ष तनुज अग्रवाल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णु महाराज,रामु गावीत,बिलकीया गावीत,गिरीष गावीत,होण्या गावीत यांनी परीश्रम घेतले.