Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भूमिहिन आदिवासी बांधवांनी सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

team by team
March 16, 2022
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
भूमिहिन दारिद्ररेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या दारिद्ररेषेखालील भूमिहिन कुटुंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) देण्यात येणार आहे. ही योजना आदिवासी विकास विभागातर्फे 100 टक्के अनुदानित आहे. नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील पात्र भूमिहिन आदिवासी लाभार्थ्यांनी व जमीन मालकांने या योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत निवडावयाच्या लाभार्थ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येणारे घटक असे : दारिद्ररेषेखालील भूमिहिन आदिवासी परितक्त्या स्त्रिया, दारिद्ररेषेखालील भूमिहिन आदिवासी विधवा स्त्रिया, भूमिहिन कुमारी माता, भूमिहिन आदिम जमाती, भूमिहिन पारधी. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे दारिद्ररेषेखालील प्रमाणपत्र (ग्रामसेवकाचे), लाभार्थ्याचे वय किमान 18 व कमाल 60 वर्षे असावे, लाभार्थी त्या गावाचा रहिवासी असावा (सरपंच व ग्रामसेवकांचा एकत्रित दाखला), दारिद्ररेषेखालील यादीमध्ये त्याच्या नावाची नोंद असावी, शाळा सोडल्याचा दाखला, वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला.

आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जमीन विक्रीसाठी इच्छुक शेतकरी,जमीन मालकाने सातबारा व 8-अ, कागदपत्र जोडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. दारिद्ररेषेखालील पात्र भूमिहिन आदिवासी लाभार्थ्यांनी व जमीन मालकाने 17 मार्च ते 28 मार्च 2022 या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार कार्यालयाकडून अर्ज वाटप करण्यात येईल.परिपूर्ण अर्ज भरुन 28 मार्च 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार रेशनवर साखर

Next Post

भूजल पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन : जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

Next Post
भूजल पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन : जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

भूजल पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन : जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add