नंदूरबार l प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आदिवासी , दलित , ओबीसी , बाराबलुतेदार , शेतकरी , व्यापारी , विद्यार्थी यांच्या विरोधात असून कुठल्याही प्रकारचे विकासाचे धोरण नसलेला हा अर्थसंकल्प आहे . नंदुरबार जिल्ह्यासह या उत्तर महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारची विशेष तरतूद नाही . केवळ केंद्राच्या योजनांच्या आधारावर स्वतःची आत्मस्तुती करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेला दिसतो . हा अर्थसंकल्प म्हणजे फसवणूक असून नंदुरबार जिल्ह्यातील बहुल आदिवासी समाजासाठी कुठलीही तरतूद न केल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे . जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुपोषणामुळे बालक मृत्युमुखी पडत असताना त्यावर देखील या सरकारने काहीच केले नाही . आरोग्याच्या प्रश्नावर देखील कुठल्याही उपाययोजना केल्या नाही . असे देखील भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी नमूद केले आहे .