नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या जाहिरनामा अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ठोस धोरणे व नाविन्यपूर्ण योजना तयार करून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य करणे. विद्यार्थी सबलीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाय योजना व रोजगार आधारित शिक्षणाच्या संकल्पना याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून करण्यात येणार आहे.
याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु कदमबांडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्या राज्यात महानगर पालिका आणि जिल्हा परिषदांच्या पोट निवडणूकसह ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारी करत आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसही यासाठी पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून नंदूरबार जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे ह्यांच्या मार्गदर्शन खाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अँड.राऊ दिलीपराव मोरे यांच्या सहकार्याने विद्यार्थी काँग्रेस जिल्ह्यात प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात आणि प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांचा जाहीरनामा हा उपक्रम राबवणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य करणे गरजेचे
विद्यार्थी महत्वपूर्ण घटक आहे. आजचा सुदृढ विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक बनतो व तो राज्याचा व देशाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी हातभार लावत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ठोस धोरणे व नाविन्यपूर्ण योजना तयार करून आपल्या महाराष्ट्रातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य करणे गरजेचे आहे.हाच विचार समोर ठेवून विद्यार्थी सबलीकरणासाठी आवश्यक असणाच्या उपाययोजना, रोजगार आधारित शिक्षणाच्या संकल्पना, राज्यातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला सुलभतेने शिक्षण मिळण्याची प्रक्रिया, त्यासंबंधीच्या योजना अश्या अनेक बाबींवर काम करणे गरजेचे आहे.त्या अनुषंगानेच महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही विद्यार्थ्यांचा स्वतंत्र जाहीरनामा तयार करणार असल्याचे म्हटले आहे.
जाहीरनामा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अंमलबजावणी
जाहीरनामा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे, पदाधिकारी विद्यार्थी- युवक कल्याण, ग्रामीण व शहरी विकास, शिक्षण, उद्योजकता, रोजगार आदी विषयात काम करणारी तज्ञ मंडळी, पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत, साहित्यिक, प्रशासक, व्यवसायिक व इतर मान्यवरांशी चर्चा करून मार्गदर्शन घेणार आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाकडून व त्यांच्या पालकांकडून सूचना मागविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
सूचनांचे एकत्रीकरना नंतर जाहीरनामा
अभियानाच्या माध्यमातून आलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करून पक्षाचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व शहरासाठी विद्यार्थ्यांप्रती एक स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्या आणि शहरामधून आलेल्या सूचना विद्यार्थी प्रदेश कार्यालयाला पाठवून राज्यभरातून आलेल्या सूचनांचे एकत्रीत करून राज्यासाठीचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे.
बबलु कदमबाड़े
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस








