नंदुरबार l प्रतिनिधी
भिल्लीस्थान लायन सेना व भारतीय किसान सेनेतर्फे ग्रामीण क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे . नंदुरबार तालुक्यातील बिलाडी या गावात सदर स्पर्धा होणार संपन्न होणार आहे .या ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन आज रोजी भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडीत तडवी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
यावेळी भारतीय किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, शहराध्यक्ष राजू माळी, भटके-विमुक्त जमातीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, पोलीस पाटील रोहत्या भिल, तालुका उपाध्यक्ष दिवदास वळवी, जगन वसावे ,सुधाकर वसावे, प्रकाश वळवी,विकेश ठाकरे, केसमल वळवी ,पिंट्या भिल, संदीप वळवी, गावकरी व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित क्रिकेट टीमच्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे यांच्यातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
ही स्पर्धा 13 फेब्रुवारी पासून 20 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे .या स्पर्धेत नंदुरबार तालुक्यातून 32 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे .सदर स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 15 हजार रुपये व ट्रॉफी ,द्वितीय बक्षीस 10 हजार रु व ट्रॉफी, तृतीय व चतुर्थ बक्षीस 5 हजार रुपये व ट्रॉफी अशा स्वरूपात देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्यात खेळ भावना वाढावी यासाठी या ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे मत उदघाटक पंडित तडवी यांनी सांगितले.








