तळोदा l प्रतिनिधी
शिवसेनेची दखल घेतल्याशिवाय शहरातील राजकारण होऊ शकत नाही.धडगावपासून शिवसेनेच्या विजयी रथाची घोडदौड सुरू झालेली असून, भविष्यात जिल्ह्यातील राजकारणातील सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती असतील. जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय पक्षांना शिवसेनेची नोंद घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा आत्मविश्वास असा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.

शहरातील वामनराव बापूजी मंगल कार्यालयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने गरजूंना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी रघुवंशी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शेर शाखेतर्फे गरजूंना भेटवस्तू वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आ.रघुवंशी म्हणाले,शिवसेना पक्ष वाढला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजेत. सर्वत्र गढूळ राजकारण सध्या सुरू आहे. भाजपचे नेते उठून सुटून शिवसेनेवर आरोप करत आहेत. त्या आरोपांना शिवसेनेचे नेते संजय राऊत चोख प्रत्युत्तर देत आहेत.शिवसेनेच्या बदनामीसाठी भारतीय जनता पार्टीने किरीट सोमय्या यांची नेमणूक केली आहे. ते उठ सूट कोणावरही आरोप करीत सुटले आहेत. त्यांनी केलेले आरोप अजून पर्यंत सिद्ध झालेले नाहीत. खोट्यानाट्या आरोपांमुळे राजकारणात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना बदनामी सहन करावे लागत आहे.
कार्यक्रमास सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी,जिल्हा प्रमुख आमशा पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, सहसंपर्क प्रमुख दीपक गवते जिल्हा संघटक राम वाडीले,युवा सेना जिल्हाधिकारी ललित जाट,नगरसेविका प्रतीक्षा दुबे,महिला बालकल्याण समिती सभापती सुनयना उदासी, माजी नगरसेवक सुनिल सोनार,शहादा नगरपालिकेचे माजी नगरसेवक विनोद चौधरी,सोनार सोसायटीचे अध्यक्ष घनश्याम सोनार,सराफ असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद सराफ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पटेल,माजी नगरसेविका कोमल सोनार,शहर संघटक विनोद वंजारी, उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, युवा सेना तालुका अधिकारी कल्पेश माळी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, सुरज माळी,अमन ठाकरे,हरीश पाटील,विजय मराठे उपस्थित होते.
संकटसमयी शिवसेनाच
कोरोना महामारी संकटाच्या काळात शिवसैनिक रस्त्यावर उभे राहून नागरिकांना मदत करीत होते. शहरात ज्या-ज्या वेळी संकट आली त्यावेळी नागरिकांच्या मागे केवळ शिवसेनेचेच धावून आल्याचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी सांगितले.








