अक्कलकुवा | प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरात अनेक वर्षा पासून आरोग्य प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे.शहरातील गटारी दिवसात अनेक वेळा ओव्हर फ्लो होवून घाण पाणी रस्त्यावर वाहत असते, तसेच ठिक ठिकाणी घानीचे ढिग पडले आहे.ज्यामुळे अक्कलकुवा शहरात घानीचे साम्रज्य दिसून येत आहे. शहरात आरोग्य विषय समस्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळेे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अक्कलकुवा शहरात गटारी दिवसात अनेक वेळा ओव्हर फ्लो होवून घाण पाणी रस्त्यावर वाहत असते त्यामुळे डासांचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.ज्यामुळे मलेरिया, टायफाईड सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता नकारता येत नाही, अनेक वेळा नागरिकांनी लेखी व तोंडी तक्रार केली असून सुधा यासमस्यांकड़े ग्रामपंचयतीकडून दुर्लक्ष केले जात आहे.अक्कलकुवा शहरातील वार्ड क्रमांक ४ मधील न्यू इंग्लिश स्कूलच्या पोषण आहारच्या खोली मागील रसत्यावरिल मुख्य गटारीचे घान पाणी हा रस्त्यावर वाहत असल्याने अनेक वेळा तलाव निर्माण होतो.त्यामुळे येणार्या जाणार्या नागरिकाना नाहकत्रास सहन करवा लागत आहे, शाळेतील विद्यार्थ्याना ही त्रास सहन करावा लागत आहे.या गटारीवरच्या फ़र्श्या तुटलेल्या आहे. आता पर्यंत अनेक वेळा सांगून सुधा दुरुस्थि केली नाही, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामपंचायतीकड़े विकास कामासाठी १४ वित्त आयोग तसेच विविध करातुन लाखो रुपये येतात परंतु शहरात कुठे ही विकास झालेला दिसून येत नाही.सफाई कर्मचारी यांचे अनेक महिनाचे वेतन दिले गेलेले नसल्याने सफाई कर्मचारी कामावर येत नाही आहे, तरी लवकरात लवकर समस्या सोड़वावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.










