नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील कोपर्ली येथे शेतकऱ्यांनी
वीजपुरवठा सुरळीत चालू रहावा या मागणीसाठी सबस्टेशन समोर ठिय्या आंदोलना नंतर विज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील कोपर्ली येथे गेल्या 15 दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत राहत न्हवता.शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागत होते.याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करीत याबाबत माहिती दिली.मात्र याबाबत अधिकारी अथवा कर्मचारी यांनी याबाबत कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज दि.7 फेब्रुवारी रोजी नंदूरबार तालुक्यातील कोपर्ली येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशन समोर ठिय्या केले.त्याठिकाणी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी फोनद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्क केला.यावेळी शेतकऱ्यांनी शेतीसाठी असलेल्या फिडरवर असलेला अतिरिक्त भार कमी करण्याची मागणी केली.यावेळी अधिकाऱ्यांनी शेतीसाठी असलेल्या फिडरवर असलेला अतिरिक्त भार कमी करीत. वीज पुरवठा सुरळीत केला. यावेळी निंभेल येथील दीपक पाटील, होळ येथील व्यंकट पाटील, विशाल पाटील ,कोपर्ली येथील सागर इन्दानी, योगेश मोरे, रविंद्र चौधरी आदी शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान शेतातील वीज पुरवठा सुरळीत झाल असला तरी गावात कर्मचारी रहिवास करीत नसल्याने काही तांत्रिक अडचण आल्यास शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून कामे करावी लागतात.त्यामुळे कर्मचाऱ्यांचा रहिवास गावात असावा त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्यास मदत होईल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.