Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रत्येकाच्या जीवनातील पाप-पुण्याचा हिशोब होणार : प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी

team by team
December 16, 2021
in सामाजिक
0
प्रत्येकाच्या जीवनातील पाप-पुण्याचा हिशोब होणार : प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी

नंदूरबार l प्रतिनिधी

अनेकांची कमी वेळेत व कमी मेहनतीने पैसा मिळविण्यासाठी धडपड असते. परंतु कमी मेहनतीने मिळणारा पैसा हे अधोगतीचे लक्षण आहे. यादवांनी मद्यप्राशन देवासमोर केल्याने त्यांनाही माफी मिळाली नाही. म्हणुन यादव कुळाचाही नाश झाला. प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग भोगायचेच असून पाप-पुण्याचा हिशोब होणारच हे निश्‍चितच असल्याचे भागवताचार्य प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी काल श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे तिसरे पुष्प गुंफतांना सांगितले.

नंदुरबार शहरात नंददर्शन (चित्ते) परिवाराच्या वतीने स्व.जुलालसिंग बाजीराव राजपूत (जिभाऊ) व स्व.उषादेवी जुलालसिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाला भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे. या कथा सप्ताहाने नंदनगरी भक्तीमय झाली असुन भागवताचार्य प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या संगीमतय अमृतवाणीतून होणार्‍या श्रीमद् भागवत कथा श्रवणाला भक्त-भाविकांची आवर्जुन उपस्थिती लाभत आहे. काल गुरुवारी सप्ताहाच्या तिसर्‍या दिवशी स्वायंभूव मनु, सतीचरित्र, धृवचरित्र, प्रियव्रत चरित्र, भरतचरित्र, अजामिळ उध्दार, प्रल्हाद अवतार, नरसिंह अवतार यावर प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी कथेचे निरुपन केले. यावेळी प.पु.पं.भगरे गुरुजी म्हणाले की, जीवनात पाप-पुण्याचा हिशोब होणार असून त्यासाठी काय करायवे व काय टाळावे हे प्रत्येकाने ठरवावे. घरातले मिष्ठान्न खातांना लक्ष भलतीचकडे जावू नये. तसेच परस्त्रीच्या देखील नादी लागु नका. कारण रावणात कली शिरला आणि परस्त्रीचा अपमान केला म्हणुन रावणाचाही नाश झाला. कळत व नकळत घडणारी हिंसा सुध्दा नाश करणारी ठरते. जीवनामध्ये विना मेहनतीने मिळविलेले धन व कलीचा झालेला शिरकाव हा विनाशकालीन ठरतो. आज ब्रॅण्डडेचा जमाना असला तरी धार्मिक संस्कृती व परंपरेनुसार श्रीमद् भागवत कथेचे श्रवण केल्यास जीवनाला नवी दिशा मिळते. गौ, गंगा, गायत्री, गीता हे आपल्या संस्कृतीचे चार स्तंभ आहेत. नदीत एक डुबकी मारली की पाप नष्ट होत नाही, तर त्यासाठी कर्म चांगले लागतात. जीवनात हातून पाप होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. श्रीमद् भागवत कथेनुसार श्रीकृष्णाची साधना केल्यास आपोआप सर्व अडचणीतून मार्ग सापडतात. त्यासाठी वयोवृध्द, ज्ञानवृध्द व तपोवृध्दांचा आदर करणे आजही काळाची गरज आहे. नित्य नियमाने प्राणायाम केल्यास इंद्रियांवर ताबा मिळवू शकतो. मनुष्य गाफील आहे त्याचा शेवटचा श्‍वास कधी येईल याची शाश्‍वती नाही. करुणावतार, संसारसारम, मागाल ते देणारे भगवान महादेव आहेत. संसार कसा करावा हे भोलेनाथांकडुन शिकावे. तसेच उत्तम संसार करण्यासाठी भोलेनाथांची पुजाअर्चा केल्यास संसार सुखाचाच होईल, असा मौलीक सल्ला भागवताचार्य प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी कथेतुन दिला.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे संजय गांधी योजना समितीच्या बैठकीत २२६ प्रकरणे मंजूर

Next Post

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नंदुरबारच्या शिक्षक संघटना प्रतिनिधींची आज बैठक

Next Post

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नंदुरबारच्या शिक्षक संघटना प्रतिनिधींची आज बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add