Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका होवू नये यासाठी पालकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक :जिल्हाधिकारी मनिषा खत्री

team by team
December 2, 2021
in आरोग्य
0
रूमाल मास्क म्हणून वापराल तर बसेल दंड, नंदूरबार जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची जाहीर केली नियमावली

नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यात शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका होवू नये यासाठी पालकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.तसेच तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी घाबरुन न जाता
प्रत्येकाने लसीकरण करने आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी खत्री यांनी केले.
नंदूरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील
रंगावली सभागृहात पत्रकारांशी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी त्या म्हणाल्या की, सध्या विदेशात ओमायक्रॉनचा संसर्ग सुुरु झाला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडून उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ओमायक्रॉनपासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तींना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यास देखील दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही. यामुळे लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच सद्यस्थितीतमध्ये जिल्ह्यात बोट, बार्ज आदी ठिकाणी देखील लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून रोज जवळ पास २० हजारांच्यावर नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.आतापर्यंत जिल्ह्यात ६५ टक्के लसीकरण झाले असून हे लसीकरण १०० टक्के करायचे आहे.गरज पडल्यास याबाबत कठोर उपाययोजना ही केल्या जातील.तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर प्रत्येकाचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील १६०० च्या वर शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांनी लसीकरण करुन घेतल्याचे प्रमाणपत्र मागविण्यात येणार आहे. यामुळे पालकांनी देखील लसीकरण करणे आवश्यक आहे. येत्या काळामध्ये याबाबत तपासणी करुन पालकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या.
मुयावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला लसीकरणाबाबत जिल्ह्याची फारशी समाधानकारक स्थिती नव्हती. मात्र महिन्याभरात जवळपास सव्वातीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे यश मिळाले आहे. ग्रामीण भागात रात्री देखील लसीकरण करण्यात आले. यासाठी १४५ केंद्रांवर ३५० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होत आहे. नागरिकांमध्ये कोरोनाबाबत भिती नसल्याने अनेकजण लसीकरण करुन घेत नाहीत. असे असले तरी कोरोनापासून सुरक्षिततेसाठी लसीकरण करण्याचे आवाहन रघुनाथ गावडे यांनी केले. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे यांनी लसीकरण केलेल्या व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून येत नाही. तसेच त्यांना कोरोनाचा कोणताही त्रास होत नाही. लसीकरण केल्यास मृत्यूदर देखील घटण्यास मदत होते. यामुळे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे चारुदत्त शिंदे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामिण भागात ६० टक्के तर शहरी भागात ४४.६९ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थीती

Next Post

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे विद्युत बिल परतफेड प्रकरणात अवमान नोटीस बजावण्याचे दिले निर्देश

Next Post
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे विद्युत बिल परतफेड प्रकरणात अवमान नोटीस बजावण्याचे दिले निर्देश

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे विद्युत बिल परतफेड प्रकरणात अवमान नोटीस बजावण्याचे दिले निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add