Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गाव समृद्ध तर मी समृद्ध’या संकल्पनेतून ‘रोहयो’च्या लेबर बजेटची आखणी करा !अपर मुख्य सचिव नंदकुमार

Mahesh Patil by Mahesh Patil
July 4, 2021
in राज्य
0
गाव समृद्ध तर मी समृद्ध’या संकल्पनेतून ‘रोहयो’च्या लेबर बजेटची आखणी करा !अपर मुख्य सचिव नंदकुमार
नंदुरबार ! प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध ’ आणि ‘गाव समृद्ध तर मी समृद्ध’ या विचारातून रोहयो कामांच्या ‘लेबर बजेट’ची आखणी करण्याच्या सूचना राज्याचे मृद, जलसंधारण व रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी  नाशिक विभागातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) दिल्या आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ‘समृद्धी लेबर बजेट 2022-23’ अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर मुख्य सचिव नंदकुमार बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालय नागपूरचे आयुक्त शान्तनू गोयल, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त (रोहयो) डॉ. अर्जुन चिखले, उपजिल्हाधिकारी रोहयो नाशिक नितीन मुंडावरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील बैठकीस ऑनलाइन उपस्थित होते.
अपर मुख्य सचिव नंदकुमार म्हणाले की, रोजगार हमी योजनेतंर्गत अधिकचे कामे देवून दारिद्रयरेषेखालील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा  शासनाचा प्रयत्न आहे. तसेच प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी गावातील प्रत्येक कुंटुबांला नरेगाच्या माध्यमातून वर्षाला निव्वळ नफा एक लाख रुपयापर्यंत मिळायला हवा यासाठी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावपातळीवर नियोजन करावे, अशा सूचना अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी सांगितले.
कामाची गरज असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तेव्हा काम देण्यात येवून  त्यांची आर्थिक उन्नती साधण्यात यावी, असे सांगून अपर मुख्य सचिव नंदकुमार म्हणाले, ‘समृद्धी लेबर बजेट 2022-23’ अंतर्गत गावे समृद्ध करताना समाजाचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे या योजनेची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, मजूर, महिला, तरुण या सर्वांना फक्त रोजगारासोबतच त्यांचे जीवन समृद्ध  होणार असल्याची जाणीव करुन देणे आवश्यक असल्याचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी सांगितले.
ग्रामीण भागात प्राधान्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कृषी व निगडीत कामे घेतल्यास ग्रामीण भागाचा गतीने विकास होणार आहे. त्यामुळे या योजनेतंर्गत मिशन वॉटर कन्झरव्हेशन तालुक्यांमध्ये किमान 65 टक्के कामे मृद व जलसंधारणाची घेण्यात यावी. तसेच 60 टक्के कामे ही शेती विषयक व त्याच्याशी निगडीत घेण्यात यावी, जेणेकरुन या सर्व कामांमुळे गावांचा, तालुक्यांचा व जिल्ह्यांचा पाणी, जमीन, वृक्ष व जीवन यांचा विकास साध्य करता येईल, असेही अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी सांगितले.
आयुक्त शान्तनू गोयल म्हणाले की, रोजगार हमी योजना शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त मनुष्यबळ निर्माण करण्याची सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, समृध्द गाव या संकल्पनेनुसार रोहयो योजनेअंर्गत सर्व यंत्रणेच्या समन्वयातून समृद्धी लेबर बजेट व आराखडा तयार करण्यात येईल. शेतकऱ्यांसह शेतमजूर, भूमिहीन, मजूर, महिला, तरुण यांच्या आर्थिक विकासासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचेही विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी  सांगितले.
*अशी आहे समृद्धी लेबर बजेट संकल्पना*
राज्यातील गावे  समृद्ध करुन अकुशल कामे मागणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होईल. या उद्देशाने येणाऱ्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंर्गत नियोजन करण्यात येणार आहे. नियोजनाचे केंद्रबिदू ग्रामपंचायत असल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील गांवे कसे समृद्ध होतील व त्या गावातील लोक श्रीमंतीच्या मार्गावर कसे जातील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतीचा लेबर बजेट व कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक उन्नती आणण्याच्या दृष्टीने गावात  ज्या कामांची  गरज आहे त्यांचे चिन्हांकन करुन अकुशल  कामांच्या भरवशावर जगणाऱ्या कुटुंबांना त्या कामांमध्ये अशा पध्दतीने सहभागी करुन घेण्यात येणार आहे. ज्यामुळे भविष्यात ते कुंटुंब स्वत:ची  आर्थिक स्थिती सुधारुन अकुशल कामाची मागणीच करणार नाही. असा या लेबर बजेट व कृती आराखड्याचा उद्देश आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर-साक्री रस्ता कामाच्या चौकशीची मागणी, बीटीपीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post

नागझरी येथे जि. प. सदस्या संगीताताई गावीत यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना सोयाबीन बियाणे वाटप

Next Post
नागझरी येथे जि. प. सदस्या संगीताताई गावीत यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना सोयाबीन बियाणे वाटप

नागझरी येथे जि. प. सदस्या संगीताताई गावीत यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना सोयाबीन बियाणे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

January 28, 2023
भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

January 28, 2023
भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

January 28, 2023
नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

January 28, 2023
व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची  घोषणा

व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची घोषणा

January 28, 2023
मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

January 28, 2023

एकूण वाचक

  • 2,686,654 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group