Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वंदे मातरम् हे केवळ गीत नाही, ते आपली प्रेरणा आहे : डॉ. मित्ताली सेठी

team by team
November 8, 2025
in राजकीय
0
वंदे मातरम् हे केवळ गीत नाही, ते आपली प्रेरणा आहे : डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार । प्रतिनिधी

“वंदे मातरम्” या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. “वंदे मातरम्” हे केवळ शब्द नाहीत, ते आपल्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्योत्तर काळाची खरी प्रेरणा आहे, असे उद्गार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी काढले आहेत.

 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने नंदुरबार शहरातील जी.टी. पाटील महाविद्यालयात आयोजित वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त सामूहिक “वंदे मातरम्” गीत गायन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत त्या होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्नेहा सराफ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, जी.टी.पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्रसिंह रघुवंशी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील, प्रमुख वक्ते गौरीशंकर धुमाळ, विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जीटीपी महाविद्यालयाचे अधिव्याख्याता, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या, 1875 साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या काव्याची निर्मिती केली आणि त्या काळात हे गीत स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचे सामर्थ्य बनले. कारागृहात असतानाही, आंदोलनाच्या प्रत्येक पावलावर, प्रत्येक मोर्चात, जेव्हा स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना प्रखर व्हायची, तेव्हा स्वातंत्र्यसैनिकांचा आवाज एकच असायचा “वंदे मातरम्!” हे गीत केवळ शब्द नव्हते, स्वातंत्र्यवीरांचे धैर्य होते. वंदे मातरम् शिकवते की, देश म्हणजे फक्त नकाशा नाही, तर मातेसमान भूमी आहे आणि आपण तिची लेकरं. आज आपण स्वतंत्र आहोत, पण वंदे मातरम् आपल्याला अजूनही आठवण करून देते की देशासाठी कार्य करणे, स्वच्छतेत योगदान देणे, शेतकऱ्याचा मान राखणे, सर्वांचा सन्मान करणे आणि समाजाच्या विकासात हातभार लावणे हेच खरे आजच्या दिवशीचे वंदन आहे. 150 वर्षांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा नाही, तर कर्तव्य पार पाडणे आहे. चला, या मातृभूमीला प्रणाम करताना आपल्या आवाजात वंदे मातरम् चा अभिमान सदैव जागृत ठेवू.

यावेळी बोलताना प्रमुख वक्ते गौरीशंकर धुमाळ यांनी वंदे मातरम् या गीताचा इतिहास आणि महती सांगताना सांगितले की, वंदे मातरम् हे गीत 1875-76 च्या दरम्यान बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ या कादंबरीत लिहिले, आणि पुढे 1882 मध्ये प्रकाशित झाल्यानंतर हे गीत राष्ट्रभावनेचे प्रतीक बनले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आंदोलन, सत्याग्रह आणि जनजागृतीत “वंदे मातरम्”चा जयघोष हा शौर्य, एकता आणि देशप्रेमाचा उर्जास्रोत ठरला. 1905 च्या बंगाल फाळणीविरोधातील आंदोलनात हे घोषवाक्य संघर्षाचा नारा बनला आणि लोकांना निर्भयपणे लढण्याची प्रेरणा मिळाली. 1950 मध्ये संविधानसभेने वंदे मातरम्‌ला राष्ट्रगीताचा दर्जा दिला. मातृभूमीला “माते”च्या रूपात पाहणारी त्यातील उपासना भारतीय संस्कृतीतील निसर्ग, माती आणि मातृत्व या मूल्यांची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. स्वातंत्र्याच्या पलीकडे जाऊन आजही हे गीत देशभक्ती, बलिदान आणि राष्ट्रीय अभिमानाची प्रेरणा जागृत करते.

यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एक प्रबोधनपर नाटिका सादर केली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

Next Post

वृद्धास जीवेठार मारणाऱ्या महिलेस न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Next Post
वृद्धास जीवेठार मारणाऱ्या महिलेस न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

वृद्धास जीवेठार मारणाऱ्या महिलेस न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add