नंदुरबार l प्रतिनिधी
येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष तसेच संबंधित विभागाचा गलथान कारभार आणि निकृष्ठ दर्जाचे रस्ते याविरोधात निदर्शने नोंदवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ दिलीपराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील करण चौफुलीवर महामार्ग खड्डेमुक्त आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने केलेले दुर्लक्ष आणि संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातून गेलेल्या महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. या खड्ड्ंयाच्या साम्राज्याविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे निदर्शने नोंदविण्यात आली.
नंदुरबार शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गवर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काहीवेळा अपघातही घडतात. प्रसंगी काही वाहनधारकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. या निकृष्ठ दर्जाच्या रस्त्याची चौकशी होवून त्वरीत महामार्ग खड्डमुक्त करण्यात यावा आणि वाहनधारकांना दिलासा मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आले.
यावेळी राट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला मराठे, युवक तालुकाध्यक्ष दिनेश माळी, विद्यार्थी शहराध्यक्ष जयंत मोरे, युवक कार्याध्यक्ष कालू पहेलवान, राष्ट्रवादी नंदुरबार शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे, युवक उपाध्यक्ष लाला बागवान, अनमोल पाडवी, अदनान मेमन, राजु शिंदे, लखन चव्हाण, सुनिल ठाकरे, मच्छिंद्र शिंदे, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.