Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी रहिवाशांना आधार नोंदणी करण्याचे आवाहन

team by team
October 20, 2022
in राज्य
0
थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी रहिवाशांना आधार नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई  l

 

 सामाजिक न्याय विभागासह इतरविभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी रहिवाशांनी आधार नोंदणी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

 

 

समाजातील डावललेल्या घटकांना सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही त्यांनी नमूद केले. आधार सक्षमीकरण आणि रहिवाशांच्या कल्याणासाठी डीबीटी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

 

 

 

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समन्वयाने “महाराष्ट्र राज्यासाठी आधार वापर सुलभ, आधारच्या वापराला चालना देण्यासाठी नवीन/अद्ययावत उपक्रम” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज सह्याद्री अतिथीगृह, येथे करण्यात आले होते.

 

 

 

 

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ गर्ग, (DDG UIDAI RO) मुंबई , सुमनेश जोशी, Jt Secy DBT मिशन केंद्र सरकार, सौरभ तिवारी, अमोद कुमार, (DDG UIDAI) (मुख्यालय), अन्न  आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेंद्र डी. सावंत, नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव प्रवीण के. पुरी, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, पोक्राचे प्रकल्प संचालक परिमल सिंग यांच्यासह कार्यशाळेला राज्य शासन, केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ गर्ग यांनी गेल्या दशकात आधारने केलेल्या प्रगतीबद्दल विवेचन केले. त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले की, आधार प्रमाणीकरण ऑनलाइन प्रमाणीकरणाद्वारे एखाद्याची ओळख सिद्ध करण्यासाठी त्वरित यंत्रणा प्रदान करते. (UIDAI) रहिवाशांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवेल यावरही त्यांनी भर दिला. एस. असीम गुप्ता, (मुख्य सचिव आयटी, महाराष्ट्र सरकार ) यांनी नोडल विभाग DIT द्वारे आधार वापर वाढवण्यासाठी, कलम 7 आणि कलम 4,4,b,(ii) अंतर्गत योजनांच्या अंमलबजावणीसाठी घेतलेली पावले आणि उपक्रम याची माहिती दिली. त्यांनी DIT भविष्यातील फोकस क्षेत्रे आणि योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व विभागांकडून आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण समर्थन यावर प्रकाश टाकला.

 

 

 

 

 

सुमनेश जोशी, (DDG UIDAI RO मुंबई,) यांनी यावेळी बोलताना आधार हा भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा गाभा कसा बनला आहे हे स्पष्ट केले. ते म्हणाले की, आधारने विशिष्टता, प्रमाणीकरण, आर्थिक माहिती आणि ई-केवायसी या मूळ वैशिष्ट्यांसह सरकारी अधिकाऱ्यांना विविध सबसिडी, फायदे आणि सेवांच्या वितरणासाठी थेट रहिवाशांपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे.

 

 

 

कार्यशाळेच्या विविध सत्रांमध्ये आधारची वैशिष्ट्ये, आधार नोंदणी आणि घेतलेले पुढाकार, आधारच्या वापरावरील प्रमुख विकास, डेटा गोपनीयता आणि माहिती सुरक्षा, यावर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारसाठी थेट लाभ हस्तांतरण DBT आणि त्याची अंमलबजावणी प्रक्रिया. UIDAI च्याअधिकाऱ्यांनी DBT चे महत्त्व आणि राज्य एकत्रित निधीतून वितरित केलेल्या योजना आणि लाभांसाठी कलम – 7 राजपत्रित अधिसूचना जारी करणे यावरप्रकाश टाकला. सुशासन अंतर्गत अधिसूचना जारी करण्यासाठी कलम 4(4)(b)(ii) शी संबंधित चर्चाही झाली.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा महाविद्यालयात अर्थ, वाणिज्य व नियोजन मंडळाचे उद्घाटन

Next Post

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज

Next Post
अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add