नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबई येथे मोर्चासाठी जाणाऱ्या नंदुरबार येथे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी माध्यमातून अडवणूक करण्यात आली आहे.पोलिसांनी ट्रॅव्हलर जमा केली आहे.दरम्यान जिल्ह्यातून १०० ते १५० कर्मचारी खाजगी वाहनातून रात्री उशिराने मुंबईला मोर्चासाठी रवाना झाले.
नंदुरबार येथून मुंबईला मोर्चासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी काल दि.९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास रवाना होणार होते. काही खासगी वाहने त्यांनी केली होती. यात दोन क्रुझर आणि एका ट्रॅव्हल समावेश होतात त्यापैकी दोन क्रुझर रवाना झाल्या तर ट्रॅव्हलर बसला ( MH 39/AD 1383) पोलिसांनी अडविली त्यांच्याकडून कागदपत्रांची मागणी केली.परवानगी नाही असे कसे जाता येईल, चाप्टर केस करावे लागेल असे सांगत कर्मचाऱ्यांना मुंबईला जाण्यापासून रोखण्यात आले. असे असले तरी जिल्ह्यातून शेकडो कर्मचारी नंदुरबार येथून मुंबई येथे मोर्चा ला खाजगी वाहनाने रात्री उशिराने रवाना झाले. दरम्यान हा संप सुरूच राहील नंदुरबार आगारातील काही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांनी निलंबनाची देखील मानसिक तयारी केली आहे. दरम्यान हा संप असाच सुरू राहील अशी माहिती कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे, मंत्रालयावर निघणाऱ्या भव्य धडक मोर्चा साठी उशिरा रात्री नंदुरबार जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली आहे. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद राहण्याची शक्यता आहे.








