नंदुरबार l प्रतिनिधी
प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकलश प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदनगरीत येत असून या निमित्ताने १००१ दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचा भव्य महाआरती सोहळा पार पडणार आहे. त्याचबरोबर प्रयागराज संगमतीर्थ गंगाजलच्या १ लाख बाटल्यांचेही नंदनगरी वासियांना वितरण देखील केले जाणार आहे.
हा २१ व्या शतकातील दुर्मिळ योग असून नंदनगरीच्या इतिहासात प्रथमच असा सोहळा पार पडणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून अधिक माहिती देताना सांगितले की, प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकलश प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदनगरीत येत असून या निमित्ताने १००१ दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचा भव्य महाआरती सोहळा दिनांक : ०९ मार्च २०२५, रविवार, सायं. ७ वा. पोलीस कवायत मैदान, नेहरु पुतळा जवळ, नंदुरबार येथे संपन्न होईल.
त्याचबरोबर प्रयागराज संगमतीर्थ गंगाजल पाण्याच्या १ लाख बाटलींचे नंदनगरी वासियांना वितरण देखील केले जाईल. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अविनाशजी जोशी (भागवत कथाकार, नंदुरबार) तसेच स्वानंदजी ओक (अनुलोम, महाराष्ट्र राज्य प्रमुख) हे लाभले आहेत. तरी नंदनगरीतील समस्त जनतेची उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन मा. आदिवासी विकास मंत्री तथा आमदार, डॉ. विजयकुमार गावीत , अमळनेर विधानसभेचे मा. आमदार शिरीष चौधरी, जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे , श्री. अमोल गायकवाड (उत्तर महाराष्ट्र विभाग जनसेवक, अनुलोम) आयोजक अॅड. प्रितम प्रविण निकम (नंदुरबार लोकसभा जनसेवक, अनुलोम) संदिप ढोले (नंदुरबार विधानसभा भाग जनसेवक, अनुलोम) यांनी केले आहे.