Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठासाठी जलरथाचा शुभारंभ

Mahesh Patil by Mahesh Patil
February 24, 2024
in राजकीय
0
जिल्ह्यात शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठासाठी जलरथाचा शुभारंभ

 

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनाविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

 

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागणात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम.डी.धस,भारतीय जैन संघटनेचे डॉ.कांतीलाल टाटीया आदी उपस्थित होते. ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्त्रोत शास्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजना विषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील ६ तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या ६ जलरथाना आज दि २३.०२.२०२४ रोजी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

 

 

 

 

ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढवा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यातील गावांमध्ये जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ६ तालुक्यात जल रथाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे . गावात जल रथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स वाजविण्यात येणार आहे .तसेच गावात ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात येउन ग्रामस्थांना माहितीपत्रक दिले जाणार आहेत. तसेच भारतीय जैन संघटनेतर्फे नियुक्त केलेल्या समन्वयकामार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. तसेच गावातील जलस्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करण्यासाठी भारतीय जैन संघटना सहकार्य करणार आहे .

 

 

जल जीवन मिशन च्या माध्यमातून गावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे या अनुषंगाने उत्तम दर्जाची कामे ग्रामस्थांनी करून घ्यावेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाची कामांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करून गावे स्वच्छ व सुंदर करावीत तसेच जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण या योजनेतून गावे पाणीदार करावीत असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी यावेळी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

26 ते 28 फेब्रूवारी दरम्यान “जाणता राजा” महानाट्याचे आयोजन; जी.टी.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर प्रवेश विनामुल्य: मनीषा खत्री

Next Post

स्वातंत्र्यानंतर प्रथमच तोरणमाळच्या दुर्गम भागाला आमच्या प्रयत्नांमुळेच मिळाले रस्ते, पाणी, वीजपुरवठा: खा. डॉ.हिना गावित

Next Post
स्वातंत्र्यानंतर प्रथमच तोरणमाळच्या दुर्गम भागाला आमच्या प्रयत्नांमुळेच  मिळाले रस्ते, पाणी, वीजपुरवठा: खा. डॉ.हिना गावित

स्वातंत्र्यानंतर प्रथमच तोरणमाळच्या दुर्गम भागाला आमच्या प्रयत्नांमुळेच मिळाले रस्ते, पाणी, वीजपुरवठा: खा. डॉ.हिना गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2025, मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर : डॉ. मित्ताली सेठी

नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित

December 31, 2025
जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

December 31, 2025
नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

December 29, 2025
द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

December 29, 2025
बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

December 27, 2025
शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

December 27, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group