Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

येत्या पंधरा दिवसात तापी-बुराई योजनेला आवश्यक मान्यता प्राप्त होणार : डॉ.विजयकुमार गावित

Mahesh Patil by Mahesh Patil
November 23, 2023
in राजकीय
0
येत्या पंधरा दिवसात तापी-बुराई योजनेला आवश्यक मान्यता प्राप्त होणार : डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तातडीच्या उपाय योजना करणे चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून तापी – बुराई योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणे चालू असून त्याला यश आले आहे. त्या कामाला आवश्यक असलेली शासकीय मान्यता येत्या पंधरा दिवसात प्राप्त होईल; अशी माहिती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.

 

 

यावर्षी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. नंदुरबार तालुक्यात देखील सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला. नदी नाल्यांना पूर न आल्यामुळे धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही तसेच तलाव आणि बंधारे यातही पाणी साठलेले नाही. परिणामी अद्याप हिवाळा चालू असतानाच येत्या उन्हाळ्यात अनेक गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल असे दिसत आहे. नंदुरबार तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. त्या सर्व पार्श्वभूमीवर प्रलंबित तापी-बुराई योजना तातडीने पूर्णत्वास येणे आवश्यक बनले आहे.

 

 

या संदर्भाने माहिती देताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, येत्या उन्हाळ्यात अनेक गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल असे दिसत आहे. नंदुरबार तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. ते सर्व लक्षात घेऊन राज्य सरकारकडे मी सातत्याने पाठपुरावा चालवला असून तातडीच्या काही उपाय योजना केल्या जाव्या असे सुचविले आहे.

 

 

दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर चर्चा केली होती. प्रलंबित तापी बुराई योजनेचा उर्वरित टप्पा पूर्ण केला जावा, अशी आग्रहाची मागणीही मांडली होती. त्याला आता यश मिळाले असून येत्या पंधरा दिवसात तापी बुराई योजनेला आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त होतील आणि पुढील चार महिन्यात तापी बुराई योजनेचे काम पूर्णत्वास येऊन पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

संविधान दिवसानिमित्त शहाद्यात दि.26 रोजी संविधान रॅलीसह प्रबोधनात्मक जनजागृती कार्यक्रम

Next Post

लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 पैकी 45 जागांवर महायुती विजयी होणार : चंद्रशेखर बावनकुळे

Next Post
लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 पैकी 45 जागांवर महायुती विजयी होणार : चंद्रशेखर बावनकुळे

लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 पैकी 45 जागांवर महायुती विजयी होणार : चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2025, मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर : डॉ. मित्ताली सेठी

नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित

December 31, 2025
जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

December 31, 2025
नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

December 29, 2025
द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

December 29, 2025
बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

December 27, 2025
शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

December 27, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group