नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय सेवा दलाचे नेते महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. अखिल भारतीय कांग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस प्रभारी लालजी प्रसाद मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता राकेश शेट्टी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धुळे काँग्रेस भवन बैठकीचे आयोजन करण्यात आली होती.
लोकशाही सक्षम करण्यासाठी नागरिकांना वस्तुस्थितीची माहिती देणे गरजेचे आहे. आज शेतकरी शेतमजूर आणि मध्यमवर्गीय नोकरदारांना जीवन जगणे कठीण झाले आहे. परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी आणि गोरगरिबांना दिलासा मिळण्यासाठी सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रत्येक मतदारापर्यंत न्यावी असे आवाहन काँग्रेस सेवा दलाच्या महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी लालजी प्रसाद मिश्रा यांनी केले आहे.
यावेळी धुळे शहरातील मिश्रा यांनी सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस भवनात मार्गदर्शन केले. येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता पक्ष बांधणी आणि संघटन करण्यास सुरुवात झाली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साबीर शेख, सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष आलोक रघुवंशी, जिल्हाध्यक्ष रविंद्र चौधरी,सरचिटणीस दीपक पाटील,शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार, नंदुरबार जिल्हाध्यक्ष एजाज बागवान, आयुब खाटीक उपाध्यक्ष देशमुख, शिरपूर तालुकाध्यक्ष अजय पाटील,शिंदखेडा तालुकाध्यक्ष विनोद अहिरराव यावेळी काँग्रेस सेवा दलाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








