नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रेवानगर येथील जिल्हा परिषदेच्या मध्यल्या सुटीत खेळण्यासाठी गेलेले ७ विद्यार्थ्यांना विषारी वनस्पतीच्या बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे, तत्कात त्यांना औषधोपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा प्रकार टळण्यासाठी संबधित प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेवानगर येथील तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीचे विद्यार्थी दुपारीच्या सुमारास शालेय पोषण आहारातील भात खाल्यानंतर बाहेर पडले होते. त्यानंतर शिक्षक जेवणासाठी बसले असता पंधरा ते वीस विद्यार्थी शाळेच्या बाहेरील बाजूस खेळावयास गेले. तेथे त्यांनी विषारी असलेले वनस्पतीचा बिया खाल्या.
या नंतर दीड ते २ तासाने या पैकी ७ ते ८ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने ते घरी गेले. रात्री उलट्याचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ होत असल्याचे पाहून गावातील नागरिक ग्राम.सदस्य पिंट्या पावरा, राहुल पावरा, मनीषा पावरा, दगडु पावरा, संदीप पावरा, मन्या पावरा, नाथ्या पावरा, सरपंच हिरालाल पावरा यांच्या सह परिसरातील तरुणांनी त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांनी औषधोपचार करून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मनीषा पाटील यांच्यासह आरोग्य विभगातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले.
विषबाधा झालेले विद्यार्थी
निधी विष्णू पावरा( वय ९) , पुनम छोटू पावरा (वय ७), आहान मेहरसिंग पावरा( वय ७), भाग्यश्री किसान पावरा (वय ८), अश्विनी, जालमसिंग पावरा (वय ८), प्रीती राजेंद्र पावरा (वय ७) , सेजल लक्षमन पावरा (वय ७) यासह गावातील काही बालकांचा समावेश आहे.