नंदूरबार । प्रतिनिधी

धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील जवान
जम्मु काश्मीर येथे सेवा बजावत असतांना अतीबर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमखल्लनामुळे अडकून वीरमरण आले आहे. हे वृत्त कळताच गावात एकच शोककळा पसरली आहे.

मनोज लक्ष्मण गायकवाड (वय 41) रा. चिंचखेडा ता. धुळे असे मयत जवानाचे नाव आहे. सैन्यामध्ये त्यांचे मुळ युनिट 23 फिल्ड वर्कशॉप असुन सध्या ते 56 राष्ट्रीय रायफल जम्मु काश्मीर येथे सेवा बजावत होते.
त्यादरम्यान ते दि.18 नोव्हेंबर रोजी अतीबर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमखल्लनामुळे तेथे अडकले होते.त्यानंतर हवामानाच्या दुष्परिणामामुळे त्यांना होत असणार्या शारीरीक त्रासामुळे तातडीने हवाईमार्गाने पुढील उपचाराकरीता 168 सेना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांना शारीरीक तपासनी नंतर मृत घेषित करण्यात आले. मयत जवान मनोज गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुपाली गायकवाड आहेत. मयत जवान गायकवाड येथे 21 वर्षापासून देशसेवा करीत होते. त्याच्या मृत्यूचे वृत्त गावात धडकताच शोककळा पसरली आहे.









